राजवाडा भाजी मंडईत महिलेचा विनयभंग ; पितापुत्रविरोधात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 30 December 2025


सातारा : राजवाडा भाजी मंडई येथे दोन जणांनी महिलेचा विनयभंग केला असल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी पितापुत्रविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ४० वर्षीय महिला ही राजवाडा भाजी मंडई येथे भाजी विक्रीचा व्यवसाय करत असताना महिलेने तुकाराम बाकले यांना तुमच्या भाजीच्या दुकानाची उंची कमी करून आमच्या दुकानाच्या लाईनमध्ये करा असे सांगितले म्हणून तुकाराम बाकले आणि क्षितिज उर्फ पप्पू तुकाराम बाकले (रा. सातारा) यांनी याचा राग मनात धरून महिलेला शिवीगाळ करून मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. यावेळी महिलेला जवळ ओढून तिच्या कानाखाली मारण्यात आली. दोघांना समजावण्यास आलेल्या महिलेच्या पतीला देखील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून दोघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस नाईक यादव करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मारहाण केल्याप्रकरणी कळंबे येथील एकच कुटुंबातील ८ जणांविरोधात गुन्हा दाखल
पुढील बातमी
सातारा शहर व तालुक्यातील दोन जण बेपत्ता ; शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची फिर्याद दाखल

संबंधित बातम्या