सातारा : नवरात्र उत्सव म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. त्याला संस्मरणीयतेचे रूप देताना सातारा तालुक्यातील आरळे केंद्रातील सर्व शिक्षिकांनी एकत्र येत समाज प्रबोधनात्मक महाभोंडला साजरा केला.
सातारा तालुक्यातील आरळे विभागातील उपक्रम- शिक्षकांकडून मतदान प्रक्रिया जागरूकता आणि नवभारत साक्षरता अभियान राबविण्यात आले.
सातारा तालुक्यातील 14 प्राथमिक शाळा व 5 हायस्कूल येथील 53 महिला शिक्षिका भोंडल्याच्या निमित्ताने मालगाव हायस्कूल मालगाव येथे एकत्र आल्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी जयश्री गुरव उपस्थित होत्या. त्यानंतर पारंपारिक पद्धतीने हत्तीचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये, समाजामध्ये मतदान प्रक्रियेविषयी जागरूकता निर्माण व्हावी, ही काळाची गरज असल्याचे यावेळी जयश्री गुरव यांनी कार्यक्रमात बोलताना नमूद केले. आमचे मत तुमचे मत ,आहे ग मोलाच आणि असाक्षरांना शिकूया साक्षर भारत बनवूया असा संदेश सर्व शिक्षकांनी भोंडल्याच्या गीतातून दिला. या भोंडल्यासाठी मालगाव येथील माता पालक आणि ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या.
गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. केंद्रप्रमुख सुरेश भुरकुंडे यांनी स्वत: उपस्थित राहून या अनोख्या उपक्रमात शुभेच्छा दिल्या. वास्के मॅडम यांनी स्वागत केले. सौ. गुरव मॅडम आणि प्रतिभा चौगुले यांनी गीतगायन केले सौ. साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. महाडिक यांनी आभार मानले.