सातारा : पूर्वीच्या भांडणावरून परळी येथील पान टपरी व्यावसायिकाला तिघांनी कोयत्याच्या मुठीने बेदम मारहाण केल्याची घटना यवतेश्वर गावच्या हद्दीतील डोंगरमाथा हॉटेल परिसरात घडली. याप्रकरणी आकाश मनोज घाडगे वय सत्तावीस रा. परळी, ता. जि. सातारा याने फिर्याद दिली आहे.
साहिल इनामदार, ऋषिकेश विटकर व इतर तीन अशा पाच जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आकाश घाडगे याचे संबंधितांशी जुने भांडण आहे. या भांडणातून ऋषिकेश विटकर व साहिल इनामदार याने मनोज घाडगे व त्याचे दोन मित्र रोहित व निनाद यांना शिवीगाळ केली व आकाश घाडगे याला कोयत्याने मारहाण केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण करत आहेत.