पश्चिम महाराष्ट्रात वीजबिलांपोटी १६ हजारांवर

ग्राहकांचे धनादेश ‘बाऊंस’; १.२१ कोटींचा दंड

by Team Satara Today | published on : 26 October 2024


center" >

अनादरीत धनादेशासाठी चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीचे नाव, संबंधीत खात्यात रक्कम नसणे आदी कारणे दिसून येत आहेत. अनादरीत धनादेशाद्वारे अनेक वीजबिलांचा एकत्रित भरणा केला असल्यास प्रत्येक वीजबिलासाठी दंडात्मक रक्कम व विलंब आकार लावण्यात येत आहे. त्यानुसार प्रत्येक वीजबिलासाठी ७५०/- रुपये बँक अॅडमिनिस्ट्रेशन चार्जेस व १.२५ टक्के विलंब आकार पुढील महिन्याच्या वीजबिलात इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येत आहे.

धनादेश दिल्यानंतर तो क्लिअर होण्यासाठी साधारणतः तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. धनादेशाची रक्कम जमा झाल्याच्या तारखेलाच वीजबिल भरणा ग्राह्य धरला जातो. याउलट पश्चिम महाराष्ट्रामध्ये दर महिन्याला राज्यात सर्वाधिक ४२ लाख १२ हजार (७९ टक्के) लघुदाब वीजग्राहक सरासरी ११९५ कोटी ७० लाख रुपयांच्या (८० टक्के) वीजबिलांचा घरबसल्या व सुरक्षितपणे भरणा करीत आहेत.

महावितरणकडून लघुदाबाच्या घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर ग्राहकांना घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनला’द्वारे क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅकींग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगची सोय उपलब्ध आहे व प्रत्येक वीजबिलासाठी ०.२५ टक्के (५०० रुपयांच्या मर्यादेत) सूट देण्यात येत आहे. यासोबतच दरमहा थेट बॅंक खात्यातून इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सिस्टीम (ईसीएस) आणि ५ हजार रुपयांपेक्षा अधिक वीजबिलासाठी ‘आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा-जावलीतील जनतेचे प्रेम आणि विश्वास हीच माझी ताकद
पुढील बातमी
महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम

संबंधित बातम्या