सातारा : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आपले संपूर्ण जीवन समाजासाठी खर्ची घातले. कुशल प्रशासक असलेल्या अहिल्याबाई होळकर यांनी लोकांवरील अन्याय दूर करून त्यांना विकासप्रवाहात आणले. त्यांचे जीवनचरित्र समाजासाठी कायम प्रेरणादायी राहील, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
रामवाडी ता. जावली येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, भाजप जावली तालुकाध्यक्ष संदीप परामने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, दत्ताशेठ पवार, विजय शेलार, मीनाक्षी बेलोशे, समीर अत्तार, विकास धोंडे, सरपंच संतोष महामूलकर, प्रमिला गोळे, संतोष शेलार, किरण भिलारे, भाई गावडे, राजू गोळे, जीवन भोसले, राजू महाडिक, दिनेश गायकवाड, शुभम मोहिते आदी उपस्थित होते.
राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाची सुरुवात रामवाडी येथील श्रीराम मंदिराच्या स्वच्छतेने झाली. त्यानंतर भागातील पाच सरपंचांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्रांना अभिषेक करण्यात आला. रामवाडीचे सरपंच अजय पाडळे यांनी प्रास्ताविक केले, तर वैष्णवी संजय गोळे हिने राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर प्रभावी भाषण करून उपस्थितांची मने जिंकली. भाजप जावली तालुकाध्यक्ष संदीप परामने यांनी ‘अहिल्याबाई होळकर आदर्श महिला पुरस्कार’ वितरणामागील भूमिका स्पष्ट केली. अहिल्याबाई होळकर या कुशल प्रशासक होत्या आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन भागातील आदर्श महिलांचा गौरव करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी महिलांना साडी वाटप करण्यात आले. श्रीरामाची महाआरती व महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले. यावेळी रामवाडीचे माजी सरपंच सतीश गलगले, गणेश पाडळे, रामदास गलगले, सदाशिव गोळे, शामराव धनवडे, रामवाडी महिला अध्यक्षा संगीता पाडळे, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.