सातारा : सातारा शहरासह तालुक्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघेजण बेपत्ता झाल्याच्या नोंदी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कासाणी, पो. रोहोट, ता. सातारा येथील अनिल मारुती बादापुरे (वय 55) हे दि. 3 ते 4 रोजीच्या दरम्यान कोणासह काहीही न सांगता निघून गेले आहेत. ते अद्याप परतले नाहीत. सातारा तालुका पोलीस ठाण्यात लिलाबाई भैरु खोपडे (वय 65) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार कर्णे तपास करत आहेत.
तसेच, येथील राष्ट्रीय महामार्गालगतच्या महिंद्रा शोरुम समोरुन दि. 7 रोजी राहूल नारायण भालेराव (वय 45, रा. भालेवाडी, ता. गंगाखेड, जि. परभणी) हे कोणासह काहीही न सांगता निघून गेले आहेत. याबाबत नारायण महादू भालेराव (वय 75) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार शिंदे तपास करत आहेत.
तसेच, श्रध्दा हिंमत खंदारे (वय 21, रा. मल्हार पेठ, सातारा) ही दि. 7 रोजी राहत्या घरातून कॉलेजमध्ये फी भरण्यास जाते असे सांगून निघून गेली आहे. ती सापडली नसल्याने सविता हिंमत खंदारे (वय 50, रा. मल्हार पेठ) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार सुकडे तपास करत आहेत.