मुंबई : समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. बुलढाण्यात झालेल्या अपघाताला एक महिना उलटत नाही तोवर समृद्धीवर दुसरा अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल १६ जणांचे प्राण गेले आहेत.
समृद्धी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्यातील काम युद्धपातळीवर सुरू आहे. रात्रकालीन काम सुरू असताना शहापूर सरंळाबे येथे क्रेन आणि स्लॅब कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं काम जोरात सुरु आहे. रात्रीही समृद्धी महामार्गाचे काम सुरु होते, त्यावेळीच ही दुर्दैवी घटना घडल्याचे समजतं आहे. शहापूर सरलांबे येथे ही घटना घडली आहे. सोमवारी रात्री ११ च्या दरम्यान ही घटना घडली असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ पथकाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.सुरक्षेची कोणताही उपाय योजना नसल्यामुळे मजुरांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजुरांवर कोसळला. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १६ मृतदेह शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात आणले आहेत. तीन ते चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, “शहापूर तालुक्यातील सरलंबे येथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यातील काम सुरु असताना घडलेल्या दुर्घटनेत मजुरांचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. पुलाचं काम सुरू असताना गर्डर मशिन आणि क्रेन खाली कोसळल्यानं हा अपघात झाला. बचावकार्य युद्धपातळीवर राबवलं जात आहे. जखमींवर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी ही प्रार्थना. मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो”, असं ट्वीट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.