08:49pm | May 25, 2024 |
सातारा : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या संक्रमणाची वेळ आहे. चांगल्या दर्जाचे व विचारांचे तरुण राजकारणात यायला पाहिजेत. मात्र प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात जनतेच्या मनात प्रचंड चीड आहे. राजकारणातली नैतिकता संपत चालली आहे. वाडा विरुद्ध गावगाडा अशी राज्यात तीव्र नाराजी आहे. राजकारणाच्या प्रवाहात विस्थापितांचे शोषण होत आहे. त्यांची मोट बांधण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर लवकरच दौरा करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सातार्यात पत्रकार परिषदेत दिली.
बुलडाणा वरून रात्री उशिरा तुपकर सातार्यात दाखल झाले. येथील मुक्तांगण भवनामध्ये त्यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. ते पुढे म्हणाले, सातारा जिल्हा हा चळवळींचा जिल्हा आहे, या चळवळींनी सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला व समाजकारणाला गती दिली. मात्र आजच्या राजकारणामध्ये वैचारिक चळवळी, तरुण आणि शेतकर्यांचे प्रश्न बाजूला पडले आहेत. राजकारणाचा ट्रेंड सध्या बदलतोय. राजकारण प्रस्थापितांचे बनले असून राज्यातील राजकारणांविषयी सामान्य जनतेच्या मनात तीव्र नाराजी आहे. ही नाराजी दूर करून समाजातील विस्थापित जे आहेत त्यांची मोट बांधण्यासाठी मी लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहे.
या दौर्याची सुरुवात बुलडाणा येथून करणार असून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व कोकण असा प्रदेशनिहाय दौरा होणार आहे. या दौर्यामध्ये चांगल्या विचारांचे तरुण पुढे आणून त्यांना राजकारणात सक्रिय करणे आणि शेतकरी व तरुणांचे प्रश्न घेऊन वैचारिक चळवळी वृद्धिंगत करणे हा या दौर्याचा मूळ हेतू असल्याचे तुपकर यांनी सांगितले. महाराष्ट्र प्रस्थापितांच्या राजकारणाला बळी पडतोय. तो महाराष्ट्र वाचवण्यासाठी तरुणांची मोठी फौज उभी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भामध्ये कापूस व सोयाबीन, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस दर हे प्रश्न दरवर्षी गंभीर होतात. यामध्ये शेतकर्याला हमीभाव मिळत नाही. यामध्ये सुद्धा प्रस्थापितांचे राजकारण आडवे येते. हे प्रश्न घेऊन सरकारला रोखठोकपणे जाब विचारला जाणार असल्याचे तुपकर यांनी सांगितले. राज्याच्या राजकारणात स्थित्यंतराची अवस्था आहे. शेती प्रश्नाचं राजकारण होत नाही, शेतकर्यांची वोट बँक उभारली जात नाही. शेतकर्यांच्या प्रश्नाचे राजकारण म्हणजे शेतकर्यांच्या प्रश्नांना दिशा देणे हा अर्थ इथे अभिप्रेत आहे. शेतकरी जागरूक करणे आणि राज्य सरकारवर दबाव टाकणारा शेतकर्यांचा दबाव गट तयार करणे हे आमच्या चळवळीचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या एकूण पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले, साखर पट्ट्यामध्ये राजकारणाची दिशा बदलते आहे. सर्वसामान्य हा विकासाच्या प्रतीक्षेत आहे. महायुती की महाविकास आघाडी, या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, हे आत्ताच सांगणे अवघड आहे. मात्र आमच्या बुलढाणा जिल्ह्यात दलित व मुस्लिम मते महाविकास आघाडीला हस्तांतरित झाल्याचे चित्र असून महायुती तिसर्या स्थानावर होती. मी अपक्ष बुलढाणा लोकसभा लढवताना महायुतीचे डझनभर नेते माझ्या विरोधात येऊन बोलून गेले. मात्र अयोध्या, राम मंदिर असे कोणतेही धार्मिक मुद्दे मी माझ्या प्रचाराच्या आड येऊ दिले नाहीत. शेतकर्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात चर्चा घडवत मी मतदार राजाचा शंभर टक्के कौल मिळवला असेल, असा दावा त्यांनी केला. या निवडणुकीत लोकांनी मला वर्गणी काढून उभे केले. त्यामुळे विजय माझ्या बाजूने असेल, अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |