सातारा : ग्रामीण महाराष्ट्र स्मार्ट व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासना मार्फत आर आर आबा सुंदर गाव स्पर्धा दर वर्षी आयोजित केली जाते. याच्या मूल्यमापनाचा भाग म्हणून जिल्हा स्तरीय समितीने सातारा तालुक्यातील कळंबे गावाला भेट दिली. कळंबे ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे जल्लाषात स्वागत केले.
भेटीदरम्यान नागराजन यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंबे मध्ये प्रयोगशाळा, मुलांचे अभ्यास, वाचन व लेखन तपासणी गुणवत्ता बाबत पाहणी केली. पंचायत समिती सातारा मार्फत आयोजित बीज संकलन स्पर्धा अंतर्गत विद्याथ्यांर्नी १०० पेक्षा जास्त बिया गोळा करून त्याचा अभ्यास व शाळेच्या बीज संकलन केंद्र बाबत त्यांनी विशेष कौतुक केले. असे बीज संकलन सर्व शाळांमध्ये होणे आवश्यक आहे, या बाबत इच्छा व्यक्त केली.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, सहाय्यक गटविकास अधिकारी संतोष पवार, गटशिक्षण अधिकारी खंदारे, प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हेर येथील डॉक्टर सुदर्शन मेहता, विस्तार अधिकारी संदीप दीक्षित, विस्तार अधिकारी दळवी, माजी सभापती सरिता इंदलकर, अमित लवंगारे, सरपंच प्रवीण मस्के, उपसरपंच ॲड. विजय इंदलकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य मार्गदर्शक संभाजी इंदलकर आदी मान्यवर उपस्थित होते.