बहुतांशी पर्यटनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी होते व त्यामुळे वाहतूकीवर परिणाम होतो. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग स्थानिक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन मोठ्या प्रमाणावर जिवीत हानी होते हे टाळण्याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्या., सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद (बांधकाम विभाग) यांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या रस्त्यांवावत सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. त्यामध्ये रस्त्याची दुरुस्ती, गतिरोधक, दिशादर्शक फलक, सुचनांचे फलक इत्यादीबाबत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.
नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आवश्यक तेथे तात्काळ स्थलांतरण करा : जिल्हाधिकारी संतोष पाटील
by Team Satara Today | published on : 20 August 2025