रिपाई आठवले गटाकडून भारत जिंदाबाद रॅली

by Team Satara Today | published on : 30 May 2025


सातारा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून भारत भूमीचे संरक्षणासाठी शौर्याने लढणाऱ्या जवानांना प्रोत्साहन देण्यासाठी शाहू चौक येथून भारत जिंदा बाद रॅली गुरुवारी दुपारी काढण्यात आली. ही रॅली शाहू चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, राजवाडा, मोतीचौक, पोलीस मुख्यालयमार्गे पोवईनाका शिवतिर्थ अशी आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली.

देशामध्ये सिंदूर नावाचे ऑपरेशन केले. यामध्ये यश आले. यात ज्यांनी सहभाग घेवून भारताचा स्वाभिमान जिवंत ठेवला. ज्यांनी आमच्या भगिनींचे कुंकू पुसले, त्याला धडा देण्यासाठी भारत हा एकसंघ आहे हे जगाला दाखवून दिले. भारत देश जगात कुठेही कमी नाही, हे दाखवून दिले. या सिंदुर नावाच्या ऑपरेशनमध्ये काही जण शहीद झाले त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि तसेच योगदान देणाऱ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी ही भारत रॅली रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली भारतभर काढण्यात आली आहे. त्याचप्रमाणे साताऱ्यातही रॅली काढण्यात आली. 

यावेळी आठवले गटाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खेड मागासवर्गीयचा निधी वनवासवाडीकडे वळवला
पुढील बातमी
पळशी येथील तरुणाचा मृतदेह ३६ तासांनंतर सापडला

संबंधित बातम्या