सातारा : मणिपूर येथे होत असलेला हिंसाचार आणि देशभरात होणारे स्त्रियांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू यांनी हस्तक्षेप करावा व केंद्र सरकारला तशा प्रकारचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारे निवेदन आज सातारा येथे राष्ट्रीयता जागर अभियान सातारा यांच्या वतीने आयोजित मोर्चाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान निघालेल्या मोर्चामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग होता.
मणिपूर येथील घटनांच्या निषेधार्थ सातारला सोमवारी निषेध व सहवेदना मोर्चा राष्ट्रीयता जागर अभियानच्या वतीने आयोजित करण्यात आला होता
सोमवार, दि. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता राजवाडा (गोलबागेपासून) खालील रस्त्याने (कर्मवीर भाऊराव पाटील पथ) हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चाच्या वतीने पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मोर्चाच्या अग्रभागी तिरंगा ध्वज घेऊन महिला कार्यकर्ती होती. मणिपूर मधील महिलांवरील अत्याचाराच्या घटना या मानवी संस्कृतीला काळिमा फासणार्या आहेत. या निंदनीय घटनेबाबत निषेध व सहवेदना व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चात विविध क्षेत्रातील संवेदनशील व भारतीय संविधानावर विश्वास ठेवणारे नागरिक बंधू भगिनी सहभागी झाले होते. मोर्चाच्या प्रारंभी वनिता कुंभार, सादिका बागवान, अर्पिता देवरुखकर यांनी क्रांतिकारी गाणी सादर केली.
अभागी, असहाय्य मणिपूरी कुकी जनतेप्रती सद्भावना दर्शवणे आणि या देशाच्या लेकी ज्यांची दिवसा ढवळ्या हजारों लोकांच्या समोर नग्नावस्थेत धिंड काढण्यात आली. बलात्कार करण्यात आले. अशा दुर्दैवी लेकींसाठी सहवेदना दाखवण्यासाठी हा मोर्चा होता मोर्चाचे निवेदन जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले. या प्रकरणी थेट राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करून केंद्र सरकारला निर्देश द्यावेत अशी आग्रही मागणी करण्यात आली.
या मोर्चामध्ये विजय मांडके, राजेंद्र शेलार, धनश्री महाडिक, तुषार भद्रे, जयश्री शेलार, नलिनी वर्पे, संजय गाडे, गणेश भिसे, शिरिष जंगम, रर्वीं. मनिषा बर्गे, भारत लोकरे, अनिल जाधव, रविंद्र पाटील, अमरनाथ गायकवाड, सादिका बागवान, कॉ आनंदी अवघडे, दादा आवटे, फादर अल्वा, आदींची भाषणे झाली.
मोर्चात रर्वीं.वर्षा देशपांडे, रर्वीं.राजेंद्र गलांडे, जयंत उथळे, मिनाज सय्यद, चंद्रकांत खंडाईत, गणेश कारंडे, गौतम भोसले, डॉ राजश्री देशपांडे, वनिता कुंभार, रजनी पवार, प्रदीप मोरे, सलमा कुलकर्णी - मोरे, सागर भोगावकर, बाबा भोरे, हेमा सोनी, सागर गायकवाड, रर्वीं. शरद जांभळे, डॉ. गीतांजली पोळ, राजन कुंभार, वंदना माने, डॉ दिपक माने, उदय चव्हाण, प्रकाश खटावकर, सलिम आतार आदींसह बहुसंख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मणिपूर येथील घटनांच्या निषेधार्थ सातार्यात सहवेदना मोर्चा
मणिपूर प्रकरणी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशी मोर्चेकर्यांनी केली मागणी
by Team Satara Today | published on : 31 July 2023

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा