मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाळ्यात पडलेला दुष्काळ आणि आता अवेळी होणारा पाऊस यामुळे शेतीचे आणि बळीराजाचे मोठे नुकसान होत आहे. या पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश जिल्हास्तरावर घेण्यात आले आहेत. मात्र दुष्काळी भागात पंचनामे होऊन बरेच ठिकाणी आर्थिक मदत मिळालेली नसल्याचा आरोप शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी राजस्थान आणि तेलंगणामध्ये प्रचारासाठी गेलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरेंनी जहरी टीका केली.
"माझ्या राज्यातील शेतकरी विविध समस्यांशी झुंजत आहे. अवकाळी पाऊस, गारपीट आणि इतर अस्मानी संकटांच्या तडाख्याने शेतकरी त्रस्त आहे. असे असताना जो माणूस स्वत:च्या घराची (राज्यातील समस्यांची) काळजी न करता बेपर्वाईने दुसऱ्या पक्षाच्या प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात जात असेल तर असा माणूस राज्याचा कारभार करायला नालायक आहे. अशा माणसाला सत्तेवर राहण्याचा किंवा मी राज्याचा महत्त्वाचा भाग आहे हे बोलण्याचा अधिकार नाही", अशा शब्दात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.
"अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. कांद्याचे आणि द्राक्षाचे नुकसान झाले आहे. मात्र आजचे मुख्यमंत्री स्व:ताचे घर सोडून दुसऱ्याचे घर धुंडाळत आहेत. दुसऱ्यांचे घर धुंडाळणारे हे भुरटे शेतकर्यांना काय न्याय देणार? शेतीमध्ये मुख्यमंत्री हेलीकॉप्टरने जातात. इतर शेतकर्यांचीही तेवढीच प्रगती झाली पाहिजे असे माझे मत आहे. भाजप सध्या प्रचारांमधून रेवड्या उडवत आहेत. इतर राज्यांवर रेवड्या वाटणारे महाराष्ट्राला कधी देणार?" असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. तसेच शेतकर्यांना अद्यापही पीकविमा मिळाला नाही? पीकविम्यावरुन शेतकर्यांची थट्टा केल्याचाही आरोप त्यांनी केला.
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कॅफे मालकावर गुन्हा |
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |