बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता नेटफ्लिक्स या ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. तरी सुद्धा अजूनही सगळीकडे त्याचीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. खरंतर या चित्रपटानं 66 दिवसात वर्ल्डवाइड 807.6 कोटींचं कलेक्शन केलं होतं. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाला संपूर्ण देशातून खूप प्रेम मिळालं असताना दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर यांनी चित्रपटाला मिळालेल्या यशावर केलेल्या वक्तव्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
'मिर्ची मराठी' ला दिलेलल्या मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी 'छावा' या चित्रपटाला मिळालेल्या यशावर वक्तव्य केलं आहे. त्यांनी चित्रपटाला मिळालेल्या यशाकडे ते कसे पाहता याविषयी सांगितलं आहे. ते म्हणाले की " 'छावा' ला जे यश मिळालं आहे त्यासाठी विकी कौशल कारण नसून त्यानं जी ऐतिहासिक भूमिका साकारली आहे ते आहे."
पुढे चित्रपटाविषयी बोलत असताना विकी कौशल विषयी महेश मांजरेकर म्हणाले, "विकी कौशल एक उत्तम अभिनेता आहे. त्याच्या 'छावा' या चित्रपटानं 800 कोटींची कमाई केली. पण असं असलं तरी विकी कौशल हे बोलू शकत नाही की लोकं त्याला पाहायला आले होते. कारण तेव्हा तर लोकं त्याचे मागील 5 चित्रपट पाहायला देखील गेले होते. प्रेक्षक खरंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला पाहण्यासाठी गेले होते. त्याच्या मागच्या चित्रपटांनी इतकं चांगलं प्रदर्शन केलं नाही."
पुढे महेश मांजरेकर याविषयी सविस्तर सांगत म्हणाले की, "हा महाराष्ट्रच आहे ज्यानं या चित्रपटाला ऐतिहासिक यश मिळवून दिलं. ते म्हणाले, माझ्या महाराष्ट्रनं हिंदी चित्रपटसृष्टीला वाचवलं. हे लक्षात ठेवा. आज, छालानं चांगली कमाई केली आणि त्याचे 80 टक्के श्रेय हे महाराष्ट्राला जाते. खरंतर, त्याचे 90 टक्के श्रेय हे पुणे आणि जवळपासच्या ठिकाणांना जाते. महाराष्ट्रच या इंडस्ट्रीला वाचवू शकतो."
दरम्यान, लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शक केलं आहे. तर विकी कौशलनं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली तर रश्मिका मंदानानं त्यांची पत्नी येसुबाई भोसले यांची भूमिका साकारली. या चित्रपटातील कलाकार अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्तानं देखील या चित्रपटात काम केलं असून त्यांच्या अभिनयाचं सगळीकडून कौतूक करण्यात आलं.