05:08pm | May 07, 2023 |
फलटण : फलटण तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक व शिक्षकांनी आपल्यावर शासनाने जी जबाबदारी सोपविली आहे ती पार पाडावीत. लोकांची कामे करावीत. कोणत्याही पक्षाच्या राजकारणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे भाग घेऊ नये आणि त्यांचे राजकीय कार्यकर्ते होऊ नये. अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिला.
महसूल आणि शिक्षण विभागाच्या अनेक तक्रारी आल्याने त्यांचा निपटारा करण्यासाठी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली दरबार हॉल येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्याधिकरी अर्चना वाघमळे, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी डॉ.अमिता गावडे, गटशिक्षण अधिकारी शाहीन पठाण, भाजपचे कार्यकारिणी सदस्य जयकुमार शिंदे, विश्वासराव भोसले, अभिजित नाईक निंबाळकर तसेच इतर अधिकारी व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह म्हणाले, फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही पुढाऱ्यांच्या दारामध्ये जावू देवू नका. अधिकारी व शासकीय कर्मचारी यांनी नागरिकांच्या शंकेचे निरसन करणे गरजेचे आहे व योग्य तो मार्ग दाखवणे गरजेचे आहे. कोणत्याही शासकीय कामासाठी नागरिकांना आमदार, खासदार यांच्याकडे जाण्याची आवश्यकता लागता कामा नये.
अनेक तलाठी व ग्रामसेवक गावात येत नसल्यामुळे शेतकरी तसेच विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, हे चालणार नाही. विनाकारण जर तुम्ही लोकांना त्रास देणार असाल किंवा पैशांची मागणी करणार असाल तर गाठ माझ्याशी आहे, अशी तंबी त्यांनी दिली.
पुढे खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी म्ह्टले की ग्रामीण भागातील लोकांच्या लेखी व तोंडी तक्रारी येत असून तलाठी नोंदी करण्यासाठी पैसे मागत आहेत. अनेक गावात ग्रामसेवक हजर राहत नाहीत. एकाच कामासाठी अनेक हेलपाटे मारावे लागतात. अनेक तलाठी व ग्रामसेवक हे राजकीय नेत्यांची हाजी-हाजी करण्यात वेळ घालवत असून त्यांच्या संदर्भात पुराव्यानिशी तक्रारी आहेत. मात्र आपण अद्याप गप्प असून जर त्यांच्या वागणुकीत बदल झाला नाही तर शासनाला त्यांना निलंबित करायला लावू, असा इशारा खा. रणजितसिंह यांनी दिला.
शिक्षकांनी शिक्षणाचे पवित्र काम करावे. चांगले विद्यार्थी घडवावेत. शासन तुम्हाला चांगल्या सुविधा आणि पगार देत असून तुम्ही इतर उद्योग धंदे आणि राजकारण कशासाठी करत आहात? करमाळा येथे नुकतेच चार शिक्षक वाळू व्यवसायातून निलंबित केले आहेत. फलटणचेही अनेकजण त्या रांगेत आहेत. त्यामुळे अशी वेळ यापुढे तुमच्यावर येऊ देऊ नका, असा इशारा खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिला.
ज्या जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी मोडकळीस आल्या आहेत, तसेच जेथे स्वच्छतागृहे नाहीत, प्यायला पाणी नाही तेथे तातडीने आपण निधी उपलब्ध करून देणार असून गरीब हुशार विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन आणि आर्थिक पाठबळ देणार आहोत. याबाबतीत शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन खा रणजितसिंह यांनी केले.
खासदारांनी घेतला तलाठी, प्राथमिक शिक्षकांचा क्लास...
फलटण तालुक्यातील काही तलाठी, शासकीय कर्मचारी, प्राथमिक शिक्षक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत असून फलटण तालुक्यातील तलाठी पासून ते अधिकारी यांच्या पर्यंत कोणताही शासकीय अधिकारी हा नोकरीत लागताना शासनाच्या सेवेत आहे, तर तो कोणत्याही राजकीय पुढाऱ्याच्या सेवेत कामाला लागलेला नाही; हे सर्वांनी नीट लक्षात ठेवावे; अन्यथा आगामी काळात अश्या कर्मचाऱ्यांकडे बघावे लागेल, असा इशारा खासदार रणजितसिंह यांनी दिल्याने तलाठी व शिक्षकांचा आज जणू खासदारांनी क्लास घेतल्याची चर्चा सुरू होती.आढावा बैठकीत अनेक नागरिकांच्या समस्यांचा निपटारा खासदारांनी जागेवरच केला. मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी ओबीसी दाखला मिळण्यास शासन दरबारी अनेक अडचणी येत असल्याचे फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमिरभाई शेख यांनी निदर्शनास आणून दिले. त्यासंदर्भात खा.रणजितसिंह निंबाळकरांनी येत्या पंधरा दिवसात बैठक लावून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तसेच फलटण शहरातील सुपर मार्केट व्यापारी मंडळांनी फळ विक्रेत्यांचे रस्त्यावर होत असलेल्या अतिक्रमणाबाबत निवेदन दिले.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |