साताऱ्यात शनिवारी जिल्हास्तरीय उद्योजकता मेळावा

by Team Satara Today | published on : 31 July 2023


सातारा : युवा ग्रामविकास सामाजिक सेवा संस्था सातारा आणि रिपाइं आठवले गटाची रोजगार आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शनिवार, दि ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा बँकेच्या सभागृहात जिल्हास्तरीय उद्योजकता विकास आणि रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रिपाइंचे ज्येष्ठ अण्णा वायदंडे, युवा ग्रामविकास सामाजिक संस्थेचे गणेश वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
युवा ग्रामविकास सामाजिक संस्था सातारा व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) रोजगार आघाडी सातारा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि १५ ऑगस्ट – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव च्या निमित्ताने भव्य जिल्हास्तरीय उद्योजकता विकास व रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. ५ ऑगस्ट रोजी केलेले आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील विविध शासकीय योजना राबविणारे विभाग सहभागी होत आहेत. तसेच इयत्ता ८ वी शिक्षण पासून ते पदवी शिक्षण असणाऱ्या युवक-युवतीना विविध खाजगी कंपनी, बँक आस्थापना मध्ये १००० पेक्षा जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. यासाठी दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता जिल्ह्यातून सहभागी होणाऱ्या व नोकरी साठी कार्यक्रमाच्या ठिकाणी कंपनीचे स्टॉल लावले जाणार आहेत व येणाऱ्या युवक-युवतींच्या कंपनीच्या नियमाप्रमाणे मुलाखती यामध्ये घेतल्या जाणार असून यावेळी त्यांची विविध पदासाठी निवड केली जाईल. यासाठी कार्यक्रमात सातारा जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील नामवंत विविध कंपन्या यामध्ये सहभागी होत आहेत. सातारा जिल्ह्यातील युवक - युवतीना नोकरीच्या उत्तम संधी निर्माण झालेल्या आहेत. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील मुख्य प्रशासकीय अधिकारी व उद्योजक मार्गदर्शन करणार आहेत.
यासोबतच या कार्यक्रमात सातारा जिल्ह्यातील शहरी- ग्रामीण भागातील युवक- युवतींना स्वतःचा उद्योग- व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाच्या विवध कर्ज योजना आहेत ज्याला चांगली संबशीडी (अनुदान) मिळते आहेत, अशा योजनांचा लाभ घेवून आपले जिल्ह्यातील अनेकाना स्वतःचे उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य केले जाणार आहे. यासाठी पुढील वर्षभर सहभागी होणाऱ्या युवक-युवतींच्या बँकिंग, जॉब च्या अनुषंगाने सपोर्ट drive चालविला जाणार आहे. या जिल्हास्तरीय उद्योजकता विकास व रोजगार मेळावा कार्यक्रमात शासकीय विभाग व विविध कंपनी आस्थापना सहभागी होत आहेत. तरी या कार्यक्रमात सातारा जिल्ह्यातील शहरी- ग्रामीण भागातील जास्तीत जास्त युवक - युवतींनी सहभागी व्हावे आणि स्वतःच्या उद्योग - व्यवसाय साठी काम करावे. तसेच ज्याना नोकरी हवी आहे त्यांनी विविध कंपनी आस्थापना मध्ये नोकरीच्या विविध संधी चा लाभ घ्यावा, असे आवाहन रिपाइंच्या रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश वाघमारे यांनी जिल्ह्यातील सर्व गरजू युवक - युवतीना केले आहे.
अशोक गायकवाड म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आजच्या सर्व युवक-युवतींच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासठी आणि शासनाच्या विविध विभागाच्या सहकार्याने त्यांना पाठबळ देण्यासाठी जिल्हास्तरीय उद्योजकता विकास आणि रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा लाभ युवकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मणिपूर येथील घटनांच्या निषेधार्थ सातार्‍यात सहवेदना मोर्चा
पुढील बातमी
फायनान्स कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक

संबंधित बातम्या