कराड : राज्यात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा विषय राज्यभरात चर्चेत आला असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आजारी असल्याची माहिती समोर आली. त्यांनी डेंग्यूची लागण झाल्याची माहिती अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री प्रफुल पटेल यांनी दिली होती. त्यानंतर अजित पवार यांना राजकीय आजार तर झाला नाही ना अशी चर्चां राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. अजित पवारांच्या आजारपणावर अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते. राजकीय वर्तुळातील या संपुर्ण चर्चांवर अजित पवारांनी पहिल्यांदाच उत्तर दिलं आहे.
कराडमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले की, 'दिवाळीच्या आधी मला डेंग्यू आजार झाला होता. त्या आजारामध्ये माझे १५ दिवस गेले. दुर्दैवाने त्यावेळेस मी टिव्ही पहायचो, पेपर वाचायचो, त्यावेळी राजकीय आजार अशा बातम्या पाहिल्या. मी काही असला लेचापेचा माणूस नाही, जी माझी मतं असतात ती, मी गेली ३२ वर्षींपासून स्पष्टपणे लोकांसमोर मांडत असतो. राजकीय आजार अशी गोष्टी माझ्या रक्तात आणि स्वभावात नाही.'
'कारण नसताना अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आल्या. काही दिवसांपुर्वी मी अमित शहा यांनी भेटण्यासाठी गेलो होतो. तेव्हा पण मी तक्रार करायला गेलो, अशा बातम्या आल्या. तक्रार करणं माझ्या रक्तातच नाही, शेवटी काम करत असताना सर्वांना सोबत काम करायचं असतं, तशी आपली परंपरा आहे, ती आपण चालवली पाहिजे', असंही पुढे अजित पवार म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात वाचाळवीरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलीये- अजित पवार
अलीकडे वाचाळवीरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार संविधानानं दिला आहे, त्या अधिकाराचा वापर आपण कशाप्रकारे करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र, अलीकडं कोणी काही बोलतो. आरेला कारे केले जाते. ही शिकवण ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी दिलेली नाही. ही महाराष्ट्राची परंपरा नाही, संस्कृती नाही. हे सर्वांनीच ध्यानात घेतलं पाहिजं, असा टोला सर्वच राजकर्त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कराडमध्ये बोलताना लगावला.
राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रीतिसंगम, कराड येथील समाधी स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |