09:17pm | Dec 05, 2023 |
सातारा : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पासुन प्रेरणा घेवून नौदलाच्या ध्वजावर शिवमुद्रा घेतली आहेच, आत्ता सैनिकांच्या खांद्यावरील बॅच मध्ये बदल करून त्या ठिकाणी शिव मुद्राच्या आकाराचे नवीन बॅच लावण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांनी दिली आणि राष्ट्राचा स्वाभिमान जागृत ठेवल्याबद्दल पंतप्रधानाचे अभिनंदन केले.
येथील शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम म्हणाले, नौसेना दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले आणि शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक योगदानाबद्दल सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी भावना व्यक्त केल्या. गेल्यावर्षी मोदी सरकारने नौसेनेच्या झेंड्यावर महाराजांची मुद्रा लावली होती. यावर्षीच्या नौसेना दिवसाच्या निमित्ताने आता नौसेनेच्या प्रत्येक सैनिकाच्या गणवेशावर ही मुद्रा असणार आहे. या दोन्ही गोष्टी महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या आहेत. महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.
जिल्हाध्यक्षांनी विशेष करुन नमूद केले की, स्वतंत्र भारताच्या इतिहासात गेली सत्तर वर्षे आपल्या सशस्त्र सेनांचे दिवस दिल्लीतील एखाद्या लॉनवर साजरे होत होते. मागील सत्तर वर्षात प्रथमच एक पंतप्रधान आपल्या नौसेना दिवस साजरा करण्यासाठी सिंधुदर्गावर आले होते. धैर्यशील कदम पुढे म्हणाले, मध्ययुगाच्या पूर्ण गुलामगिरीच्या इतिहासात एकमेव छत्रपती शिवाजी महाराज होते, ज्यांनी आरमाराचे महत्त्व ओळखले होते. ज्याच्याकडे आरमार त्यांची समुद्रावर सत्ता, त्या राज्याचे समुद्रकिनारे बळकट आणि अंतिमतः जगाच्या व्यापाराचे दरवाजे त्या राज्याचे खुले होतात, असा सूज्ञ विचार करून शिवाजी महाराजांनी स्वतःचे आरमार उभे केले. या अर्थाने शिवाजी महाराज हे आधुनिक भारताच्या नौसेनेचे जनक ठरतात. हे महत्व ओळखून नौसेनेच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्रेवरून प्रेरणा घेऊन नवीन मुद्रा लावण्यात आली होती. आता नौसेनेच्या प्रत्येक सैनिकाच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा असणार आहे. गुलामगिरीचे प्रतीक असलेली ब्रिटिशधार्जिणी मुद्रा आता भारतीय सैनिक वागवणार नाहीत.
जिल्हाध्यक्ष कदम पुढे म्हणाले, गेली सत्तर वर्षे स्वतंत्र भारताची नौसेना गुलामगिरीचे प्रतीक असलेल्या ध्वजाला वंदन करत होती. मोदी सरकारने हे एक गुलामगिरीचे प्रतीक नष्ट करून देशवासियांना आणि नौसेनेलाही अभिमान वाटेल, असा हा बदल करून दाखवला आहे.
आपल्या भावना व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष म्हणाले, आधुनिक भारताच्या नौसेनेचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करणारे मोदी सरकार हे स्वतंत्र भारताच्या इतिहासातले पहिले सरकार आहे. तसेच आधुनिक भारताची नौसेना या कोकणाच्या भूमीत, या महाराष्ट्राच्या भूमीत निर्माण झाली, याची जाणीव ठेवून मोदीजींनी या भूमीलाही वंदन केले. त्याच प्रमाणे कालच्या नौसेनेच्या प्रात्यक्षिकांमध्ये एका युद्धनौकेचे नेतृत्व एका महिलेच्या हातात ठेवून मोदी सरकारने महिला सक्षमीकरणासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. पंतप्रधान मोदींनी समाज हिताच्या जितक्या गोष्टी केल्या आहेत तितक्या गेल्या सत्तर वर्षात कोणी केल्या नसतील. कार्यक्रमात मोदीजींनी सांगितले की नौसेनेमध्ये सुद्धा नारी शक्तीला प्रोत्साहन देणे, ही आमची प्राथमिकता आहे. त्यासाठी विविध योजना राबवित आहोत. विविध निर्णय आम्ही घेत आहोत. अजून एक महत्वाची गोष्ट काल पंतप्रधानांनी नमूद केली ती म्हणजे लवकरच नौसेनेच्या रँक च्या नावामध्ये बदल करुन गुलामगिरीची मानसिकता कायमची नष्ट करण्यासाठी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरासतीप्रमाणे नावे दिली जाणार आहेत. सर्व विश्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पासून प्रेरणा घेवून काम करत असल्या बद्दल मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे सर्व सातारकर नागरिक आणि भारतीय जनता पार्टी च्या वतीने हार्दिक अभिनंदन केले.
सातारा लोकसभा निवडणुकीसंदर्भात बोलताना कदम म्हणाले, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी भारतीय जनता पक्ष देशात 350 हून अधिक खासदार निवडून आणणार आहे. मोदींना पाठिंबा देणार्या खासदारांमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातील खासदारही असेल. सातार्याच्या जागेबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. सातार्याचा खासदार महायुतीचाच असेल, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, भाजपचा कार्यकर्ता म्हणून भाजपचा खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गत पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला, त्याची सल आम्हाला आहे. सातार्याच्या जागेबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. सध्या भाजपचे बुथ स्तरावर काम सुरु आहे. आयुष्मान योजनेविषयी बोलताना कदम म्हणाले, ही योजना प्रत्येकाना घेणे गरजेचे आहे. आजच्या धकाधकीच्या जिवनात या योजनेद्वारे सुमारे 5 लाखांचा मेडिकल इन्श्युरन्स करण्यात येतो. त्यामुळे हॉस्पिटलचा भरमसाठ खर्च सामान्यांच्या अवाक्यात येईल आणि त्यांना पैसे खर्च करावे लागणार नाहीत. सातारा जिल्ह्यात चार हॉस्पिटल्स ही योजना राबवित आहेत.
यावेळी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, प्रदेश कार्यकारिणी सदस्या सुनीशा शहा, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, जिल्हा उपाध्यक्ष मनीषशेठ महाडवाले, रणजीत फाळके, अनु.जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित भिसे, जिल्हाध्यक्ष चित्रपट कामगार आघाडी विकास बनकर, बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हाध्यक्षा अश्विनी हुबळीकर, केमिस्ट फार्मा प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत, अनिता बोडस, प्रविण शहाणे, विक्रांत भोसले, विस्तारक अविनाश खर्शीकर, सुनील काळेकर, कृणालसिंह मोरे, रवी आपटे, अमोल टंगसाळे, विक्रम बोराटे, जयराज मोरे, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कॅफे मालकावर गुन्हा |
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |