सातारा : सातारा जिल्ह्यातून विस्थापनानंतर अनेक अडचणीवर मात करत पंढरपूर तालुक्यातील चिंचणीकरांनी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्राची निर्मिती करून गावातच रोजगार निर्माण केला आहे. या पर्यटन केंद्राला जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी भेट दिली.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन 2024 धोरणानुसार भविष्यात पर्यटन क्षेत्रामध्ये खूप संधी असून या संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे. भेट देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील मधाचे गाव मांघर या गावातील लोकांची सहल काढून चिंचणी चे मॉडेल राबवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. चिंचणीकरांनी सुरू केलेले एकात्मिक पर्यटन हे राज्य शासनाच्या एकात्मिक पर्यटन धोरणाचा भाग असून हे पर्यटन केंद्र नाविन्यपूर्ण आहे, जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले.
यावेळी चिंचणी येथील मोहन अनपट, शरद सावंत, सूर्यकांत जाधव, ज्ञानेश्वर सावंत, शिवाजी अनपट, रवींद्र जाधव, शेखर सावंत, सविता सावंत, वैशाली सावंत, मयुरी कापसे ,निता सावंत, कमल घोरपडे ,आशा पवार, शोभा सावंत यास्मिन शेख इत्यादी महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.