सातारा : राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या श्रीक्षेत्र सज्जनगड येथे दास नवमी महोत्सवानिमित्त श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने विविध मान्यवर कीर्तनकारांची कीर्तनमाला आयोजित करण्यात आली होती. या दासनवमी महोत्सवात ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त बुवा आफळे, पुणे येथील मकरंद बुवा करंबेळकर, सज्जनगड येथील समर्थ भक्त प्रतीक बुवा रामदासी तसेच ज्येष्ठ समर्थ भक्त मकरंद बुवा रामदासी यांची कीर्तने समर्थभक्तांच्या मोठ्या उपस्थितीत रंगली.
दास नवमीच्या पूर्वसंध्येला मकरंद बुवा रामदासी यांनी आपल्या कीर्तनासाठी समर्थांचा ..अनित्याचा भ्रम गेला, शुद्ध नित्य नियम केला.. हा अभंग निरूपणासाठी घेतला होता. यावेळी मार्गदर्शन करताना मकरंद बुवा म्हणाले की समर्थ म्हणतात की, श्रवणाचा आज अनादर आळसे करी जो नर त्याचा होय अपहार स्वहितविषयी,, आजच्या जीवनकालात श्रवणाशिवाय सर्व व्यर्थ आहे, कारण मनन करण्यापूर्वी श्रवण करावे लागते. आनंदात राहायचे असेल तर श्रवण म्हणजेच ऐकण्याचे काम हा खुशीचा मार्ग आहे, आनंदत्वाचे निरूपण जेथे जेथे सुरू असते तेथे जाऊन बसावे, मनाचे ऐवजी श्रवणही महत्त्वाचे आहे. गुरु शुकदेव म्हणतात की मी सुद्धा कथा कीर्तन ऐकतो, साऱ्या साधनांचे सार हे श्रवण असे आहे. जोपर्यंत जे नित्य नाही, बदलणारे आहे अशा गोष्टींवर बुद्धीने जीव विश्वास ठेवतो. अखंड, अपरिवर्तनीय व समाधानाचा अनुभव मिळावा असे ज्यांना वाटते त्यांनी हा मार्ग कमवावा. व्यवहारात सज्जन माणसे नित्यावर भरवसा ठेवतात. मात्र सैद्धांतिक पातळीवर जे नित्य आहेत अशा ठिकाणी निश्चयाने आपण मार्ग क्रमण केली पाहिजे. परिपक्व विचार केला तरच योग्य मार्ग सापडेल. निश्चयाने आपण एखादी गोष्ट अंगीकारली तर भ्रम नाहीसे होऊन खऱ्या आनंदाला प्राप्त करू शकू.
या कीर्तनाचे वेळी ज्येष्ठ निरूपणकार परमपूज्य मंदाताई गंधे, समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस, मंडळाचे कार्यवाह योगेश बुवा रामदासी, मंडळाचे खजिनदार अरविंद बुवा अभ्यंकर रामदासी ,जेष्ठ कीर्तनकार राघवेंद्र बुवा ,तसेच रसिकाताई ताम्हणकर , विलासराव ताम्हणकर, समर्थ भक्त अजेयबुवा रामदासी आदी मान्यवरांसह राज्यातून आलेल्या शेकडो समर्थ भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |