सातारा : हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा मोहिम 15 ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत वाई तालुक्यातील चादंवडी येथे या मोहिमेला उस्त्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
चांदवडी येथील ग्रामपंचायतीसमोर महिला सरंपच फरीदा शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उपसरपंच रामदास शिंदे, ग्रामपंचायत सदस्य स्नेहल शिंदे, यमुना काकडे, ज्येष्ठ नागरिक रमेश शिंदे, बाजीराव शिंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.