03:52pm | Jun 10, 2024 |
मुंबई : ‘प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली’ योजनेमुळे ग्राहकांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध होईल. परिणामी अशा वर्गवारीतील ग्राहकांच्या सबसिडीचा बोजा कमी झाल्याने महावितरणला फायदा होईल. या योजनेच्या वापरासाठी कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.
महावितरणचा १९ वा वर्धापनदिन महावितरणचे मुख्यालय प्रकाशगड येथे साजरा करण्यात आला. याप्रसंगी लोकेश चंद्र बोलत होते. ते म्हणाले, महावितरणकडून शेतीसाठी सौरऊर्जेचा देशात सर्वाधिक वापर करण्यात येणार आहे. यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत वीजपुरवठा मिळणार आहे. औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांवरील सबसिडीचा बोजा कमी होईल.
खरेदीत बचत-
१) सौरऊर्जेमुळे वीज खरेदीच्या खर्चात बचत होऊन सर्वच ग्राहकांचे वीज दर मर्यादित राखण्यात मदत होईल.
२) पारेषणविरहित सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ८.५ लक्ष कृषी पंप शेतकऱ्यांना मिळणार असून भविष्यात वीजजोडणीसाठी प्रकरणे प्रलंबित राहणार नाही, यासाठी मिशन मोडवर काम करण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांना दररोज आठ तास वीजपुरवठा-
१) महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक म्हणाले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दररोज ८ तास वीजपुरवठा करता येईल.
२) आरडीएसएस योजनेमुळे वीज यंत्रणेचे सक्षमीकरण होऊन विजेची वाढती मागणी पूर्ण करणे शक्य होणार आहे.
३) महावितरणचे संचालक अरविंद भादिकर म्हणाले, सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर, स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वसुलीवर परिणामकारक तोडगा, वीज यंत्रणेचे सक्षमीकरण व वीजहानी रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी ही कामे करण्यात येत आहेत.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |