मेढा: केळघर भागातील कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांची पाण्याअभावी दैना झाली आहे. 1991 पासूनच्या तिन दशकात या भागातून मोठ्या प्रमाणावर शहरात स्थलांतर होत आहे. बर्याच प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडल्या आहे. केडंबे येथील हायस्कूल सुद्धा बंद पडले आहे. 60 ते 70 टक्केच्यावर शेती पाणी नसल्यामुळे पडून आहे.
जावली तालुका दूध पुरवठा संघ 10 वर्षापूर्वीच बंद पडला असून भागातील दुग्धव्यवसाय पुर्णपणे संपलाय. पाण्याअभावी कुठलाच जोडधंदा करणे शक्य नाही. त्यामुळे तरूण वर्ग शहरात स्थलांतरित होतोय. येत्या काळात पाण्याची व्यवस्था न झाल्यास हा संपूर्ण भाग लवकरच निर्मनुष्य होण्याची भीती आहे. या भागातील प्रत्येक गावात आतापर्यंत चार ते पाच पाणीपुरवठा योजना झाल्यात. गेल्या 15 ते 20 वर्षात पाणलोट, जलयुक्त शिवार योजने अंतर्गत कोट्यावधी रुपये शासनाने खर्च केले आहेत.
केळघर, डांगरेघर, भामघर येथे तीन कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यावर दोन अडीच कोटी खर्च झाले. मात्र त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटला नाहीच. 54 गावांना शाश्वत पाणीपुरवठा होण्यासाठी बोंडारवाडी येथे धरण हाच एकमेव उपाय आहे. या धरणासाठी गेली 12 वर्ष प्रयत्न चालू आहेत. त्यातही बोंडारवाडी धरण कृती समिती गेली 8 वर्ष धरणासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. तीन वर्षांपूर्वी या धरणासाठी पाणी परवाना मिळाला आहे. किती भूसंपादन करावे लागणार व धरणरेषा याचा सर्वे पुर्ण झाला आहे. आता ट्रायल पिट करून प्रस्ताव प्रशासकीय मंजूरीसाठी पाठवण्याची आवश्यकता असताना शासनाने बोंडारवाडी धरणाची व्यवहार्यता तपासण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण केले आहे. याचा अर्थ यापूर्वी झालेले धरणाबाबतचे निर्णय रद्दबातल ठरतात. कृती समिती या शासन आदेशाचा निषेध करते.
जी.आर. रद्द करून बोंडारवाडी धरणास तातडीने प्रशासकीय मंजूरी न दिल्यास कृतीसमिती 54 गावांचे तीव्र आंदोलन उभारेल. त्यामधे महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी होतील, असा इशारा कृतीसमितीच्या निमंत्रक व सामाजिक कार्यकर्त्या उषा ऊंबरकर यांनी दिला आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |