मेढा: केळघर भागातील कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांची पाण्याअभावी दैना झाली आहे. 1991 पासूनच्या तिन दशकात या भागातून मोठ्या प्रमाणावर शहरात स्थलांतर होत आहे. बर्याच प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडल्या आहे. केडंबे येथील हायस्कूल सुद्धा बंद पडले आहे. 60 ते 70 टक्केच्यावर शेती पाणी नसल्यामुळे पडून आहे.
जावली तालुका दूध पुरवठा संघ 10 वर्षापूर्वीच बंद पडला असून भागातील दुग्धव्यवसाय पुर्णपणे संपलाय. पाण्याअभावी कुठलाच जोडधंदा करणे शक्य नाही. त्यामुळे तरूण वर्ग शहरात स्थलांतरित होतोय. येत्या काळात पाण्याची व्यवस्था न झाल्यास हा संपूर्ण भाग लवकरच निर्मनुष्य होण्याची भीती आहे. या भागातील प्रत्येक गावात आतापर्यंत चार ते पाच पाणीपुरवठा योजना झाल्यात. गेल्या 15 ते 20 वर्षात पाणलोट, जलयुक्त शिवार योजने अंतर्गत कोट्यावधी रुपये शासनाने खर्च केले आहेत.
केळघर, डांगरेघर, भामघर येथे तीन कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यावर दोन अडीच कोटी खर्च झाले. मात्र त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटला नाहीच. 54 गावांना शाश्वत पाणीपुरवठा होण्यासाठी बोंडारवाडी येथे धरण हाच एकमेव उपाय आहे. या धरणासाठी गेली 12 वर्ष प्रयत्न चालू आहेत. त्यातही बोंडारवाडी धरण कृती समिती गेली 8 वर्ष धरणासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. तीन वर्षांपूर्वी या धरणासाठी पाणी परवाना मिळाला आहे. किती भूसंपादन करावे लागणार व धरणरेषा याचा सर्वे पुर्ण झाला आहे. आता ट्रायल पिट करून प्रस्ताव प्रशासकीय मंजूरीसाठी पाठवण्याची आवश्यकता असताना शासनाने बोंडारवाडी धरणाची व्यवहार्यता तपासण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण केले आहे. याचा अर्थ यापूर्वी झालेले धरणाबाबतचे निर्णय रद्दबातल ठरतात. कृती समिती या शासन आदेशाचा निषेध करते.
जी.आर. रद्द करून बोंडारवाडी धरणास तातडीने प्रशासकीय मंजूरी न दिल्यास कृतीसमिती 54 गावांचे तीव्र आंदोलन उभारेल. त्यामधे महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी होतील, असा इशारा कृतीसमितीच्या निमंत्रक व सामाजिक कार्यकर्त्या उषा ऊंबरकर यांनी दिला आहे.
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |