सातारा : पुणे-बंगळूरू महार्गावर वर्ये गावच्या हद्दीत भरधाव दुचाकीची ट्रकला धडक बसली. या अपघातात बेळगाव जिल्ह्यातील निपाणीचा तरुण ठार झाला. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, याप्रकरणी सचिन लक्ष्मण चव्हाण (रा. पारे, ता. खानापूर, जि. सांगली) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार या अपघातात ऋषिकेश रवींद्र देशमाने (वय 25, रा. निपाणी, ता. चिकोडी, जि. बेळगाव) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. दि. 5 फेब्रुवारीला रात्री रात्री पावणे अकराच्या सुमारास महामार्गावर वर्ये गावच्या हद्दीत अपघात झाला. ट्रकला भरधाव दुचाकीची पाठीमागून धडक बसली. यामध्ये ऋषीकेश देशमाने हा गंभीररित्या जखमी झाला होता. या अपघातानंतर ऋषिकेशला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एस. मोरडे करीत आहेत.