थंडीमुळे विषाणूजन्य आजार बळावले

by Team Satara Today | published on : 27 November 2024


सातारा : गेले काही दिवस वारंवार वातावरणात परिणामकारक बदल होत आहेत. त्यातच थंडी पडल्याने साथीचे आजार बळवले आहेत. या सर्व प्रतिकुल परिस्थितीमुळे फ्लूसह विविध आजारांची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. खासगी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

जिल्हयात थंडी पडली असून वातावरणात बदल होत आहे. जिल्ह्यात पहाटे थंडी, दिवसा ऊन अशा बदलाच्या वातावरणामुळे आजार बळावले आहेत. वातावरणातील या बदलामुळे बालकांसह नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी यासह जाईंट फ्लू आजाराने नागरिक बेजार झाले आहेत. विशेषत: लहान मुलांना सर्दी, खोकल्याचा त्रास सहन करावा लागत आहे. सरकारी दवाखान्यासह खासगी रुग्णालयात गेले काही दिवस उपचारार्थ दाखल झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वातावरणातील बदल लहान बालक आणि वयोवृद्ध नागरिकांना सहन होत नाही. लहान मुलांना सर्दी, ताप आणि खोकला या आजाराने ग्रासले असल्याचे वाढलेल्या रुग्ण संख्येवरून दिसून येत आहे. वातावरणातील बदलांशी लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांचे आरोग्य तेवढ्या तत्परतेने जुळवून घेत नसल्याने साहजिकच आरोग्य बिघडत असल्याचा दावा काही डॉक्टरांनी केला.

वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने सर्दी, ताप, डोकेदुखी व काही प्रमाणात विषमज्वर आदी आजारांचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांनी दक्षता बाळगणे आवश्यक आहे. वातावरणातील बदलामुळे विशेषत: लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, तापेची लक्षणे आढळून येत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी घराचा परिसर स्वच्छ ठेवावा असे डॉक्टरांनी सांगितले आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बांगलादेश सरकारचा हिंदू धर्माविरोधातील कारवाया सुरु
पुढील बातमी
भाव वधारल्याने खाद्यान्नातून कांदा गायब

संबंधित बातम्या