वाई : धोम धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढली असून आज (दि ३१) सायंकाळ पासून धोम धरणातून सांडव्या वरून पाच हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले.
धोम धरणाची पाणी पातळी ७४३.८५ मी झाली झाली असून धरणा मध्ये एकूण पाणीसाठा २९८.६६५ द.ल.घ.मी. असून (७८.१२) धरणा मध्ये पाण्याची आवक ४४०० क्युसेक असून निर्धारित नुसार पाणी पातळी राखणे करिता धोम धरणांचे सांडवा व्दार क्र १,५ व २ आणि ४ हे ०.५०मी ने उघडून कृष्णा नदी मध्ये एकूण ३४०० क्युसेक विसर्ग सोडण्यात आलेला आहे.
धोम-बलकवडी धरणात १८०० क्युसेक पाणी आवक असून कृष्णा नदीतून धोम धरणात १८०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.
तसेच पावसाचे प्रमाण व आवक नुसार सांडव्याचे विसर्ग पुर्व सुचना देऊन कमी जास्त करण्यात येईल. धरणा खालील सर्व गावातील प्रशासन व ग्रामस्थ यांनी सर्तक राहून नदी पात्रात प्रवेश करू नये. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व वाई पालिका हद्दीत नदी पात्रातील काम त्वरित बंद करून नदी पात्रात कोणी काम करणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
धोम धरणातून सोडण्यात आले पाच हजार क्युसेक पाणी
by Team Satara Today | published on : 31 July 2023

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा