फलटण : नीरा उजवा कालव्याचे अपूर्ण राहिलेले सिंचन आवर्तन पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी आज फलटणसह सांगोला, पंढरपूर, माळशिरस तालुक्यांतील नेत्यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ कार्यकारी संचालक अतुल कपोले यांना निवेदन दिले. यावेळी शेतकऱ्यांच्या तीव्र भावना निदर्शनास आणून देत सिंचन आवर्तन त्वरित सुरू करण्याची आग्रही मागणीही करण्यात आली.
नीरा उजवा कालव्याचा उन्हाळी हंगाम सिंचन आवर्तन सुरू असताना अचानकपणे ता. ११ मे रोजी कालवा बंद केल्यामुळे फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांचे सिंचन अपूर्ण राहिले.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, पाणी टंचाईही तीव्र प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे लोकवस्ती व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.
निवेदन देताना आमदार दीपक चव्हाण, धैर्यशील मोहिते-पाटील, उत्तमराव जानकर, डॉ. बाबासाहेब देशमुख, बाबाराजे देशमुख, मामासाहेब पांढरे, पांडुरंग वाघमोडे, माणिक वाघमोडे, दादाराजे घाडगे, माऊली पाटील, दत्तात्रय टापरे, सोमनाथ पिसे, रावसाहेब पांढरे, संतोष वाघमोडे किरण पवार, राजेंद्र गायकवाड,
सुरेश बर्गे, वसंतराव अडसूळ उपस्थित होते. हक्काचे शिल्लक पाणी अंदाजे सव्वा टीएमसी आणि पालखीसाठी राखीव ठेवण्यात आलेले ०.८५ टीएमसी पाणी सोडून नीरा उजवा कालव्याचे राहिलेले आवर्तन पुन्हा सुरू करावे व उद्धट बॅरेजमध्ये शिल्लक असणारे पाणी नीरा नदीमध्ये सोडावे, अशी मागणी कपोले यांच्याकडे करण्यात आली आहे.
नीरा उजवा कालवा सल्लागार समितीच्या उन्हाळा हंगाम नियोजन बैठकीत मंजूर पाणी कोठा लाभधारक शेतकऱ्यांना पूर्ण मिळालेला नाही, तसेच ता. २० मे पर्यंत कालवा सुरू ठेवण्याचेही ठरलेले होते; परंतु त्यापूर्वीच सिंचन आवर्तन बंद करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचे हक्काचे सुमारे सव्वा टीएमसी पाणी शिल्लक असतानाही ते उपलब्ध होऊ न शकल्याने लाभधारक शेतकऱ्यांची उभी पिके धोक्यात आली आहेत. त्यातून शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे. त्या नुकसानीस जलसंपदा विभाग पूर्णपणे जबाबदार राहील, असेही यावेळीस कपोले यांना सांगण्यात आले.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |