सातारा जिल्ह्याचा बारावीचा निकाल 92.76 टक्के

गुणवत्तेमध्ये साताऱ्याच्या मुलीचं ठरल्या भारी

by Team Satara Today | published on : 05 May 2025


सातारा : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल सोमवारी सर्वत्र जाहीर झाला. कोल्हापूर विभागांमध्ये समाविष्ट असलेल्या सातारा जिल्ह्याचा बारावीचा 92.76 टक्के निकाल लागला आहे. सातारा जिल्ह्यातील तीनशे तीन कनिष्ठ महाविद्यालयातून 52 परीक्षा केंद्रावरून बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा सुरळीतपणे पार पडली होती. एकूण 33 हजार 346 नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी 30 हजार 754 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही मुलीचं गुणवत्तेत अव्वल ठरल्या असून, त्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 94 टक्के इतके आहे.

आज सकाळपासून बारावीच्या निकालाची गडबड विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत होती. 2025 चे बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी एकमेकांना पेढे भरवून अभिनंदन केले. परीक्षेत प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे निकाल संकेतस्थळावरून त्यांच्याविषयी विभाग निहाय्य गुण एकूण निकाल उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच त्याची ऑनलाईन प्रिंट घेण्यासाठी सायबर कॅफेमध्ये गर्दी दिसून आली. कोल्हापूर विभागातून एकूण 1112 कनिष्ठ महाविद्यालयांपैकी सातारा जिल्ह्यातून 303 महाविद्यालयातून 52 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली, सातारा जिल्ह्यातून तेहतीस हजार 346 विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती .पैकी परीक्षेला 33हजार 152  विद्यार्थी प्रविष्ट झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या तीस हजार 754 इतकी आहे. सातारा जिल्ह्याचा कोल्हापूर विभागातील निकाल 92.76 टक्के इतका लागला आहे.

कोल्हापूर विभागात कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वाधिक 94.40 टक्के इतका निकाल लागला आहे. तर एकूण सात विभागीय मंडळांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा एकूण निकाल 93.64 टक्के इतका लागला आहे. साताऱ्यात बारावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी मुलांपेक्षा जास्त आहे. तब्बल 94.58 टक्के इतक्या मुली तर 89.51 टक्के इतकी मुले बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहेत.  सर्व विद्यार्थ्यांनी "महाराष्ट्र रिझल्ट डॉट एनआयसी डॉट इन" या संकेतस्थळावर सविस्तर प्रसिद्ध करण्यात आला आहे. फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये झालेल्या बारावी परीक्षेत कोल्हापूर विभागातून सुमारे अकरा लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. कोल्हापूर विभागाच्या निकालाची माहिती विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली. सातारा सांगली कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून एक लाख 13 हजार 195 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. निकालाच्या संदर्भात तक्रार असणाऱ्या विद्यार्थ्यांनी तात्काळ परीक्षा महामंडळाच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर
पुढील बातमी
सादिक बागवान यांचे पुन्हा पालिकेत फलक झळकवून आंदोलन

संबंधित बातम्या