09:28pm | Jul 29, 2023 |
सातारा : फलटण ते बारामती रेल्वेसाठी 600 कोटी रुपये मंजूर होऊन त्याकामाची निविदा कालच प्रसिद्ध करण्यात आली असून अखेर फलटणकरांचे रेल्वे धावण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगितले की, स्वातंत्र्याच्या काळापासून रखडलेला हा रेल्वेचा प्रकल्प पूर्ण व्हावा अशी भूमिका घेऊन सोडवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलं त्यामध्ये माजी खासदार कै. हिंदुराव नाईक निंबाळकर व अन्य नेते व जनतेचे स्वप्न पूर्ण करताना मला आज आनंद होत आहे.
खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणाले की, गेली अनेक वर्ष रखडलेल्या फलटण ते बारामती या रेल्वेच्या जमिनीच्या अधिग्रहणानंतर रेल्वे लवकरात लवकर सुरू व्हावी म्हणून मी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करीत होतो. त्यास केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 600 कोटी रुपये मंजूर करून दिले व त्याची निविदा कालच प्रसिद्ध करण्यात आली.
रेल्वे ब्रीजच्या कामाला आरंभ
गेल्या महिन्यामध्ये रेल्वेचे ब्रिज तयार करण्याचे निविदा प्रसिद्ध झाली होती. त्याचे काम प्रत्यक्षामध्ये सुरू झाले. यानंतर आता रेल्वे लाईन टाकण्याचं काम प्रत्यक्षात आता सुरू होईल. लोणंद फलटण रेल्वे सुरू आहे आता बारामतीकडे रेल्वे सुरू झाल्यानंतर फलटणकरांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरताना आपण पाहणार आहे.
फलटण तालुक्याच्या विकासाला गती येणार
यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे खूप मोठे सहकार्य याकामी लाभलेले आहे. फलटण तालुका हे रेल्वेचे मुख्य ठिकाण होणार आहे. या ठिकाणी अमृत स्टेशन योजना मंजूर झालेली आहे. त्यामुळे या भागाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. दक्षिणेकडून जाणाऱ्या सर्व रेल्वे फलटण, मार्गी दिल्लीला जाणार त्यामुळे जनतेचा आर्थिक विकास होणार आहे. शेतकरी व्यापारी, विद्यार्थी, नोकरवर्ग, सर्वसामान्य प्रवासी या सर्वांनाच याचा फायदा होणार आहे व फलटण हे देशाच्या नकाशावर दळणवळणाचे मोठे साधन म्हणून दिसणार आहे. फलटणवरून मुंबई, पुणे येथे नोकरीसाठी, शिक्षण, व्यवसायिक, शेतकऱ्यांना माल पोचवण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. जनतेने दिलेल्या प्रेमातून उतराई होण्यासाठी जेवढं या मतदारसंघासाठी काय करता येईल तेवढे काम मी जनतेसाठी करणार आहे, असे मत खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |