टीम इंडियाने पहिली कसोटी 295 धावांनी जिंकली

by Team Satara Today | published on : 25 November 2024


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारताने शानदार विजय मिळवला आहे. पर्थमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने कांगारूंना 295 धावांनी धूळ चारली. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या विजयात कर्णधार जसप्रीत बुमराह, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली यांनी मोलाचे योगदान दिले. 

भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर 534 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र कांगारूंचा संघ 238 धावांवर ऑलआऊट झाला. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेडने 89 धावांची खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने 3-3 विकेट घेतल्या. तर सुंदरला 2 आणि राणा आणि रेड्डीने 1-1 विकेट घेतली. या सामन्यात भारतीय संघाने 295 धावांनी दणदणीत विजय मिळवला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
पुढील बातमी
निवडणूक आयोगाकडून मनसे पक्षाची मान्यता होऊ शकते रद्द

संबंधित बातम्या