मुस्लिम समाज प्रजासत्ताक दिन ईदप्रमाणेच साजरा करत आहे : सादिकभाई शेख

by Team Satara Today | published on : 29 January 2025


सातारा : भारताच्या स्वातंत्र्य संग्रामपासून संविधान सभेपर्यंत मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींचे योगदान महत्त्वाचे आहे . भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या सुरक्षेसाठी देखील मुस्लिम समाजाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याने मुस्लिम समाज प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन ईदप्रमाणे साजरा करतो.हा आदर्श शनिवारपेठेतील मुस्लिम बांधवांनी मेरी जान हिंदुस्थान हया कार्यक्रमातून  उभा केला आहे असे वक्तव्य सादिकभाई शेख यांनी शनिवार पेठेतील लकडीपूल येथील प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मेरी जान हिंदुस्थान कार्यक्रमात केले.भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिवस सातारा जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला . साताऱ्यातील खिदमत ए खल्क , आझाद फ्रेंड , मुस्लिम जागृती अभियान आणि अफ्फान , अलहबीब मित्रमंडळातर्फे शनिवार पेठ येथील लकडी पूल येथे अतिशय अनोख्या पद्धतीने मेरी जान हिंदुस्थान हया कार्यक्रमातून देशप्रेमाचे धडे देत व स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांचा गौरव करत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.ना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे चिरंजीव रूद्रनीलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुशरण मोदी व अय्युब शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करून अंजुमन स्कूल व आयडियल स्कूलच्या शिक्षक व विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनात ध्वजारोहण व राष्ट्रगीत आणि झेंडगीताचे गायन करण्यात आले.आयडियल इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भारतीय घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष महामानव बाबासाहेब आंबेडकर, मसुदा समितीचे सदस्य मुहम्मद सादुल्ला यांच्या वेशभूषेतुन संविधान सभेचे महत्त्व व संविधानाचे महत्त्व समजावून सांगितले .संविधान सभेमधील मुस्लिम सदस्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी एकमेव मुस्लिम महिला सदस्य बेगम एजाज रसूल , तजम्मुल हुसेन ,मौलाना हसरत मोहानी ,मौलाना अबुल कलाम आझाद, मौलाना हिफ्जुरहमान ,महाराष्ट्राचे सुपुत्र एड ऐस के काझी यांच्या कार्याचा परिचय करून दिल्याने इतिहासातील महत्वपूर्ण योगदान समाजासमोर ठेवले.मुस्लिम समाजाच्या थोर व्यक्तींनी संविधान सभेत महत्वपूर्ण भूमिका बजावली असल्याने मुस्लिम समाजाने देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान दिले आहे त्यामुळे भारतातील मुस्लिमांनी  मना मधे दडपण , कमकुवतपणा ठेवू नये असे आवाहन सादिकभाई शेख यांनी केले. संविधान सभेतील मुस्लिम सदस्यांच्या सूचना गांभीर्याने घेतल्या असत्या तर आज काही अनुचित प्रकार घडत आहेत ते घडले नसते असे म्हणत  कलम ३७० ला विरोध करणारे संविधान सभेचे एकमेव सदस्य मौलाना हसरत मोहानी होते आणि हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखावू नये म्हणून गोवंश हत्या बंदी व्हावी अथवा गोमांस खाने हया देशात प्रतिबंधित करावे अशी भूमिका घेणारे मुहम्मद सादुल्ला होते . भारत देश धर्मनिरपेक्ष होणार आहे त्यामुळे देशात धर्माचे आधारे मुस्लिम आरक्षण देवू नये अशी भूमिका बेगम एजाज रसूल आणि तजम्मुल हुसेन यांनी घेवून मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणले असल्याची माहिती सादिकभाई शेख यांनी दिली.स्वातंत्र्य सैनिक एड इस्माईल साहेब मुल्ला,उमर पैलवान,हकीम यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट पत्रकारितेचा राज्य स्तरिय पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रगती जाधव पाटील यांचा सत्कार मेरी जान हिंदुस्थान हया कार्यक्रमात करण्यात आला.भारतदेशाच्या जडणघडणीत मुस्लिमांचे योगदान अविस्मरणीय असून आज मेरी जान हिंदुस्थान हया कार्यक्रमातून भारत हा तुमचा आमचा सगळ्यांचा देश आहे हे अंडरलाइन करून दिले असल्याचे विधान प्रगती जाधव यांनी काढले व हा आदर्शवत उत्सव संपूर्ण राज्यभर साजरा केला जाईल असा विश्वास प्रगती जाधव पाटील यांनी व्यक्त केला.सिने अभिनेत्री सुरभी भोसले म्हणाल्या की हा देश सर्वांचा असून मेरी जान हिंदुस्थान हया कार्यक्रमातून जातीयवादी शक्तींचे मनसुबे उधळले जाणार असून असे कार्यक्रम सर्वत्र झाल्यास भारतातील हिंदू मुस्लिम एकता वाढेल.सुजित शेख यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सूत्रसंचालनाने उपस्तिथांना देशप्रेमाचे नवनवीन धडे मिळाले. प्रास्ताविक राशीद बागवान यांनी केले.आभार मोहसीन कोरबू यांनी मानले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन होताच उपस्थितांनी आणि खास करून नवतरुणायीने रूद्रनीलराजे भोसले यांच्याशी सेल्फी घेत लाडक्या बाबाराजेंच्याशी सहवास कॅमेऱ्यात कैद केला.खिदमत ए खल्क, आझाद फ्रेंड्स ,मुस्लिम जागृती अभियान, अफफान फ्रेंडस,अल हबीब , ग्रिन स्टार मित्रमंडळाने नेटके नियोजन केले.आरिफ खानमोहसीन कोरबू , शोएब शेख, साकीब बागवान, अजहर मनेर , सल्लाउद्दीन बागवान ,असिफ खान ,युन्नुस शेठ,आरिफ शेख, कलिम तांबोळी , सादिक मुल्ला ,इर्शाद नरवाडे,इरफानभाई , अजहर बंगाली,मुजफ्फर सय्यद , मुसर्रत शेख असिफ फरास , आबीद बागवान , मोहसीन मुलाणी , एड अमजद खान  सलीम शेख पाळणे वाले सह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. स्वर संगमचे शहाबुद्दीन शेख , युन्नुस शेख , सोहेल शेख माणिक कांबळे यांनी देशभक्ती पर गीत सादर केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा
पुढील बातमी
शासकीय चित्रकला परीक्षेत 'अनंत इंग्लिश स्कूल’ चे यश

संबंधित बातम्या