01:48am | Jul 30, 2018 |
वरकुटे मलवडी : ज्या गावाने संस्कार दिले त्या मातीचा जिव्हाळा अंतरमनात कायम ठेवीत, बनगरवाडी परिसरातील गावांचे ऋण फेडण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिन. हा माझा सत्कार नसून संपूर्ण गावाचा सत्कार आहे. असे प्रतिपादन डॉ.नितीन वाघमोडे यांनी केले. त्यांची अप्पर आयकर आयुक्तपदी पदोन्नती झाली. त्यानिमित्त बनगरवाडी ता.माण येथील भव्य श्रमसंस्कार सोहळा व गौरव महारत्नाचा या नागरी सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे सिने अभिनेता पंढरीनाथ कांबळे (पँडी), सरपंच सौ.रंजना सुरेश बनगर,राज फौंडेशनचे कार्याध्यक्ष विजय पिसे वरकुटे मलवडीचे लोकनियुक्त सरपंच बाळकृष्ण जगताप, ग्रामविस्तार अधिकारी उमेश कोळी, कृषी मंडल अधिकारी लक्षण राऊत,पाणी फौंडेशनचे समन्वयक अजीत पवार, बनगरवाडी पाणी फौंडेशन च्या ब्रँड अम्बँशिटर सौ.भामाबाई बनगर,मा.सरपंच वैभव शिंगाडे, प्रल्हाद अनुसे, डॉ.रामदास आटपाडकर,सदाशिव चेअरमन, मा.उपसभापती दादासाहेब शिंगाडे,शहाजी बनगर(पोलीस पाटील),भागवत अनुसे,सुरेश बनगर,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वाघमोडे म्हणाले की,पाणी फौंडेशनच्या कामात आपल्या गावाचा नंबर जरी आला नसला तरी टोकाचं राजकारण खेळणाऱ्या गावातील लोकांच मनसंधारण मात्र नक्कीच झाले आहे. पाणी म्हणजे देव आहे, पाणी म्हणजे सोनं आहे. गेल्या पन्नास वर्षात एकत्रितपणे काम करण्याची या गावची पहिलीच वेळ आहे.या बनगरवाडीनं पहिल्यांदा गावातील क्लेश मिटवून गावची ग्रामपंचायत बिनविरोध केली. हे पहिलं सगळ्यात मोठं यश आहे. आणि दुष्काळाबरोबर दंड थोपटून बंड केले आहे.त्यामुळे गावासभोवतालची पाण्याची पातळी वाढली आहे. गावातील बागायती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे,हे दुसरं यश आहे. हिच आपल्यासाठी फार मोठी जित आहे.यापुढे या भागात कदापि टँकरची गरज भासणार नाही.हे या गावाचे सर्वात मोठं भाग्य आहे. असे मी समजतो. उर्वरित जलसंधारणाची कामे आपण सुरुच ठेवणार असून, यापुढे गावाचा शैक्षणीक,सामाजिक सांस्कृतिक शेती विषयक आशा विविध बाबींचा विकास आपण करणार आहोत. शिवाय ईथला शेतमजूर उपजिविका करण्यासाठी मुंबई पुण्याला न जाता तो स्वतःच्या शेतात राबला पाहिजे अशी उपाययोजना बनगरवाडीत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे सिनेस्टार पंढरीनाथ कांबळे म्हणाले की, बक्षीसाच्या उद्देशाने बनगरवाडीत कामाला सुरुवात झाली परंतु या ठिकाणी तुम्हीच तुम्हाला फार मोठे बक्षीस दिले आहे.कारण गावाने एकत्रितपणे काम केल्याने शिवारात पाणी साठा वाढला आहे. त्यामुळे ईथल्या शेतकर्यांचे उत्पन्न दहा पटीने वाढणार आहे. खरोखरच धन्य आहे ईथली माती जिने नितीन वाघमोडें सारखा अधिकारी या गावाला मिळवून दिला.साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून घराघरात अधिकारी निर्माण व्हायला पाहिजेत. यावेळी परिसरातील मान्यवर, मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी,पाणी फौंडेशनचे समन्वयक अजितदादा पवार, सचिन होनमाने,बापुराव बनगर, भारत अनुसे सदाशिव बनगर,शिवाजी शिंगाडे, सदाशिव चेअरमन,ज्ञानेश्वर बनगर,आदिंनी आपले मनोगत व्यक्त करून नितीन वाघमोडे यांचे अभिनंदन केले.व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या, कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन विक्रम शिंगाडे यांनी केले. तर शेवटी आभार उपसरपंच सागर बाबर यांनी मानले.
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |