09:38pm | Apr 27, 2024 |
सातारा : देशात आज मोठ्या प्रमाणावर राजकीय अराजकता माजली असून मोदी कालखंड हा देशहिताचा ठरला नसल्याने देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही, असा जबरदस्त हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज पाटण येथील प्रचंड जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. तसेच सातारा लोकसभेचे आपले उमदेवार शशिकांत शिंदे यांना अटक झाल्यास लोकशाही मार्गाने लढा उभारणार असा इशारा ही शरद पवार यांनी दिला. महाविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या जाहीर सभेस माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, उमेदवार आमदार शशिकांत शिंदे, आमदार अरुण लाड, सत्यजितसिंह पाटणकर, सारंग पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, हिंदुराव पाटील, दीपक पवार, राजेंद्र पवार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना खासदार शरद पवार पुढे म्हणाले, यशवंतरावांचे विचार जोपासणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे आणि ते आव्हान एक सर्वसामान्य म्हणून आम्ही आतापर्यंत जोपासत आलो आहोत. सध्या राज्यातील असो अथवा केंद्रातील सरकार हे मतलबी व अराजकता माजवणारे आहे. ही निवडणूक प्रामुख्याने प्रचंड महागाई, बेरोजगारी, जातीयवाद या प्रमुख मुद्द्यांवर होत असल्याने याचा सर्वसामान्य मतदारांनी अतिशय गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. ते पदाची गरिमा राखू शकले नाहीत आजच्या या महागाईत महिला घर तर सर्वसामान्य जनता वाहने चालवू शकत नाहीत. सन २०१४ च्या तुलनेत आज प्रचंड महागाई वाढली आहे. देशातील ८७ टक्के तरुण बेरोजगार आहेत. जातीयवाद, धार्मिकता यावरच आज हा देश चालवला जात आहे. आजचे पंतप्रधान राहुल गांधी, गांधी घराणे व नेहरूंच्यावर टीकाटिप्पणी करण्यात मश्गूल आहेत. ज्या माणसांनी व कुटुंबाने आपल्या स्वातंत्र्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली, दुर्दैवाने त्यांच्यावरच टीका, टिंगलटवाळी करणे हे या देशातल्या जनतेला कधीही मान्य होणार नाही. विद्यमान पंतप्रधान त्या पदाची गरिमा राखू शकले नाहीत, त्यामुळे यापुढे देश नक्की कोणाच्या हातात द्यायचा हे ठरवणारी येणारी लोकसभेची निवडणूक असल्याने निश्चितच सातारा जिल्हाच नव्हे तर राज्य व देशातही परिवर्तन अपेक्षित आहे. या अपेक्षित परिवर्तनामध्ये शशिकांत शिंदे यांच्यासारख्या एका अभ्यासू, परखड व्यक्तिमत्वाला आपण संसदेत बहुमताने पाठवा असे आवाहनही शेवटी शरद पवार यांनी केले. सर्वसामान्य मतदारांमध्ये चीड यावेळी आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सध्या राज्यात फक्त पक्ष फोडणे, खोकी, ईडी, सीबीआयसारख्या संस्थांच्या दबाव व आमिष दाखवण्यापलीकडे काहीच घडत नाही. सत्ताधाऱ्यांनी भलेही आमदार, नेते फोडले असले तरी सर्वसामान्य मतदार मात्र या सर्वांची चीड बाळगून आहेत. आता राज्यघटना बदलण्याची हिंमत करणाऱ्या व लोकशाहीसाठी घातक असलेल्या विघातक वृत्तींविरुद्ध ही निवडणूक होत असल्यामुळे तुम्ही आम्ही बेसावध न राहता अत्यंत जबाबदारीने चांगल्या खासदारांना विजयी करण्यासाठी सर्वस्व समर्पित करणे गरजेचे आहे. पाटण मतदारसंघातून प्रचंड अपेक्षा सध्याचे पालकमंत्री आपल्या पदाचा गैरवापर करत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या अनैतिक सरकारविरोधात आपल्याला लढायचे असेल तर पाटण मतदारसंघातून प्रचंड अपेक्षा आहेत. महाराष्ट्रातील जे नाट्यमय राजकारण सुरू आहे ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याच आशीर्वादाने होत असल्याने आता गद्दारांना धडा शिकवण्यासाठी शशिकांत शिंदे यांच्यासारख्या प्रामाणिक माणसाला निवडून देणे सार्वत्रिक हिताचे ठरणार आहे. या निवडणुकीच्या निकालात गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याची खरी जबाबदारी आपल्या या मतदारसंघातील सर्वसामान्य मतदाराच्या हातात आहे असेही ते म्हणाले. निष्ठावंत कसा असावा हे आजवर विक्रमसिंह पाटणकरांनी तर शेलारमामा कसा असावा हे श्रीनिवास पाटील यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या याच तालुक्यात सत्ताधारी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड जनतेचा रोष आहे. तो रोष घालवत नव्याने क्रांती करायची असेल तर माझ्यासारख्या सामान्य माथाडी व कायमच पवार साहेबांशी एकनिष्ठ असलेल्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी आपण सर्वजण प्रामाणिकपणे प्रयत्न कराल असा विश्वास शशिकांत शिंदे यांनी याप्रसंगी व्यक्त केला. जीव गेला तरी साथ सोडणार नाही माझ्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून जाणीवपूर्वक कारवाया केल्या जात आहेत. मात्र माझा जीव गेला तरी चालेल, मी पवार साहेबांची साथ कधीही सोडणार नाही. आपल्या सत्तेचा गैरवापर करत माझ्यावर कितीही केसेस टाकल्या तरीही मी मरेपर्यंत पवार साहेबांचा कट्टर व निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून राहीन असे शशिकांत शिंदे म्हणाले. सर्वसामान्य माणूस व लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची असून देशात , राज्यात व जिल्ह्यातही राजकीय मुजोरी वाढली आहे. पाटण तालुका या निवडणुकीत मताधिक्यात सिंहाचा वाटा उचलेल असा विश्वास सत्यजितसिंह पाटणकर यांनी यावेळी व्यक्त केला. चारशे पारचा नारा देणाऱ्यांना या निवडणुकीत आपण धडा शिकवू असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. डॉ . भारत पाटणकर म्हणाले हुकूमशाहीचा पराभव करत लोकशाहीचा विजय करण्यासाठीची ही निवडणूक आहे. सध्या देशात मोदी शहांसह अदानी, अंबानीसारखी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी माणसे देश चालवत आहेत. त्यामुळेच महागाई, बेरोजगारी, अत्याचार, जातीयवाद वाढला आहे. पाटण मतदारसंघात तर सर्वाधिक हुकूमशाही पहायला मिळत आहे. निवडणुका आल्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न देण्याची मागणी करतात मग त्यांच्या काळात त्यांचे हात अथवा तोंड कोणी बांधले होते हा विचार करणे गरजेचे आहे. येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय हा आपल्या सर्वांच्या सार्वत्रिक हिताचा ठरणार आहे. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, विक्रमसिंह पाटणकर, हर्षद कदम आदिंची भाषणे झाली. स्वागत सुभाषराव पवार यांनी केले तर आभार राजाभाऊ शेलार यांनी मानले. या महामेळाव्यास नरेश देसाई, सुरेश पाटील, बाळासाहेब राजेमहाडिक, ॲड. अविनाश जानुगडे, स्नेहल जाधव, दिनकरराव घाडगे, सुभाषराव पवार, सुजित पाटील, राजेश पवार, नगराध्यक्षा मंगल कांबळे, उप नगराध्यक्ष सागर पोतदार तसेच महाविकास आघाडी मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने पाटण विधानसभा मतदारसंघातील लोक उपस्थित होते.
काहींना निवडणूक काळात यशवंतरावांची आठवण !
सातारा जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्राला स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची परंपरा असून आता निवडणूक काळात काहींना यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची आठवण होतेय ही आनंदाची बाब आहे, अशी खोचक टीका शरद पवार यांनी याप्रसंगी केली. स्व. यशवंतरावांचे विचार व परंपरा जोपासायची असेल तर या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनाच संसदेत पाठवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र अन्याय सहन करत नाही हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही
महाविकास आघाडीचे सातारचे उमेदवार शशिकांत शिंदे हे कामगार नेते आहेत, लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे. काही ना काही करून त्यांना अडवायचे कसे ? या निवडणुकीत त्यांना थांबवायचे कसे ? याचे सूत्र यांच्या डोक्यात आहे. त्यामुळेच त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. शशिकांत शिंदे यांना त्यांनी अटक केल्यास त्याविरोधात आम्ही सातारा जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यातील तालुक्या - तालुक्यात संयमाने आणि लोकशाहीच्या मार्गाने संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही. हा अन्याय आणि अत्याचार महाराष्ट्र सहन करत नाही हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असा खणखणीत इशारा शरद पवार यांनी दहिवडी येथील जाहीर सभेत बोलताना दिला.
खाजगी शाळांतील आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करा |
निवृत्तीवेतनधारक/कुटूंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
पतीकडून पत्नीला पेटवण्याचा प्रयत्न |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलास मारहाण |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू |
पाण्यात बुडून आठ वर्षीय मुलाचा मृत्यू |
सातार्यातून युवक बेपत्ता |
निकालावर समाधानी नाही; सरकार पक्षाने अपिलात जावे |
सातारा येथे गजानन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन सोहळा |
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला |
गावदेव मिरवणुकीत जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांत धुमश्चक्री |
साताऱ्यात पाणीपुरवठ्याचा व्हॉल्व्हला गळती |
सिव्हील हॉस्पिटलच्या पार्कींगमधून दुचाकीची चोरी |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू |
पाण्यात बुडून आठ वर्षीय मुलाचा मृत्यू |
सातार्यातून युवक बेपत्ता |
निकालावर समाधानी नाही; सरकार पक्षाने अपिलात जावे |
सातारा येथे गजानन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन सोहळा |
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला |
गावदेव मिरवणुकीत जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांत धुमश्चक्री |
साताऱ्यात पाणीपुरवठ्याचा व्हॉल्व्हला गळती |
सिव्हील हॉस्पिटलच्या पार्कींगमधून दुचाकीची चोरी |
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
सराईत गुन्हेगारांकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड; 35 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत |