11:26am | Apr 23, 2024 |
वाई : तरुण मुले देशाचे भविष्य आहेत. त्यांना प्रगती पथावर नेण्याची संकल्पना अमलात आणण्यासाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील स्थिर सरकार निवडून देऊया असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
पसरणी ता. वाई येथे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाचे दर्शन घेतल्यानंतर आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार मदन भोसले भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुरभी भोसले माजी उपसभापती विजयसिंह नायकवडी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड पसरणीच्या सरपंच हेमलता गायकवाड रोहिदास पिसाळ दीपक धनवडे विकास शिंदे भाजप तालुका उपाध्यक्ष यादव महांगडे चंद्रकांत धायगुडे राजश्रीताई धायगुडे राजेंद्र गायकवाड सुनील महांगडे राष्ट्रवादी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश येवते यांची उपस्थिती होती.
उदयनराजे म्हणाले, भैरवनाथाला नतमस्तक होऊन मी विजयाचा लेणं मागितला आहे. ज्या ठिकाणी स्थिर सरकार असते तिथेच विकास होत असतो भाजप शिवसेना आरपीआय रासप यांची महायुतीचे सरकार देशात स्थिर सरकार देऊ शकते. पूर्वी काँग्रेसच्या सत्ता केवळ दोन लोकसभा सदस्य होते. त्यामध्ये अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचा समावेश होता भाजपने दोन वरून स्थिर सत्तेपर्यंत मजल मारलेली आहे. भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष बनलेला आहे. मोदी सरकारने राबवलेले अनेक उपक्रम जनतेसाठी फायदेशीर ठरले. विरोधकांकडे मात्र पंतप्रधान पदासाठी चेहरा नाही.
मदन भोसले म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. त्यांचे वंशज सुराज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने हा देश कोणाच्या ताब्यात द्यायचा हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ वाई तालुक्यांमध्ये पसरणीतून होतोय त्यामुळे श्री काळभैरवनाथा चां उदयनराजेंना आशीर्वाद मिळाला आहेत.
अशोकराव गायकवाड म्हणाले उदयनराजेंना पसरणीतून सगळ्यात जास्त लीड देण्याचे काम आम्ही करणार आहोत. काँग्रेस सरकारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना दारिद्र्याला सामोरे जावे लागले होते आज शेतकरी, महिला, मजूर, खेळाडू यांना चांगले दिवस आलेले आहेत. शेतकऱ्यांना पेन्शन देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय सर्वांसाठी फायदेशीर ठरला आहे जो राजा महाराष्ट्राच्या मनामनावर अधिराज्य गाजवते त्याच राजाच्या वंशजाला निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी जीवाचे रान करायचे आहे.
काँग्रेसचे मिली जुली सरकार मध्ये ब्लॅकमेलिंग :
दहा वर्षांपूर्वी काँग्रेसचे मिली जुली सरकार केंद्र सत्तेवर होते अशा सरकारमध्ये ब्लॅकमेलिंग चा प्रकार वाढत असतो त्यामुळे स्थिर सरकार असणे अत्यंत आवश्यक आहे असे उदयनराजे म्हणाले.
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |