अजित जगताप
सातारा: गेली वर्षभर सातारा जिल्ह्यात सुमारे 40 ठिकाणचे वाळू लिलाव थांबल्यामुळे महसूल विभागाला जमा होणारा 200 कोटी तर या व्यवहारातून होणार्या 500 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, सर्वत्र मोठ्या प्रमाणात विकासकामे व शहरीकरण होत असल्याने वाळूला मोठी मागणी आहे. पूर्वी तीन हजार रुपये ब्रास मिळणारी वाळू अवैधरित्या सध्या दहा ते बारा हजार रुपयाला मिळू लागली आहे. नदीकाठ ते गावातील मुख्य रस्ता या वाळू वाहतूक करण्यासाठी वाळू ठेकेदार आपापसांत समजता करून रस्त्यालगतच्या शेतकर्यांना व पुढार्याना लाभ मिळवून देतो. वाळूला सोन्याचा भाव आल्यामुळे सोन्यापेक्षा ही वाळूची गुंतवणूक चांगली मानली जात आहे. एकाद्या कंपनीच्या उत्पादनाला जास्त मागणी असली की त्या कंपनीचे शेअर्स घेतले जातात. तशा पद्धतीने सातारा जिल्ह्यातील वाळू व्यवसायात भ्रष्ट अधिकारी, स्थानिक पुढारी, पोलीस व प्रसार यंत्रणा गुंतल्याची चर्चा अनेकदा चर्चिले जात आहे. यामध्ये तथ्य सुद्धा आहे.
अधिकार्यांशी जवळीक साधून काही लोक प्रतिनिधी यांचा वाळू व्यवसायात हात असल्याचे अनेकदा उजेडात आले आहे. वाळूमुळे सार्वजनिक व व्यक्तिगत बांधकामे थांबले आहे. तर काही ठिकाणी वाळूच्या तस्करीमुळे बांधकाम खर्चात वाढ झाली आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना, कण्हेर, उरमोडी, वेरणा, तारळी, येरळा, माणगंगा अशा नद्या दुथडी वाहत असल्याने वाळू काढणार्या यांत्रिक, बोटीसुद्धा धक्क्याला लावलेल्या आहेत. वाळू लिलावसाठी तहसीलदार मार्फत सर्वेक्षण केले जाते त्यानंतर जिल्हा स्तरीय, राज्य स्तरीय तसेच पर्यावरण समितीकडून मान्यता दिली जाते.
ई-पध्द्तीने व ऑनलाईन लिलाव प्रक्रिया होत असताना राष्ट्रीय हरित लवादाचे ही मत घेतले जाते. सातारा जिल्ह्यातील वाळू लिलावसाठी पुणे, सांगली, नवी मुंबई, कोल्हापूर, सोलापूर येथील ठेकेदार स्थानिकांच्या मदतीने लिलाव प्रक्रियेत भाग घेतात. सातारा जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून आलेले अधिकारी आपल्या नातेवाईकांना सुद्धा वाळू व्यवसायत मदत करतात. त्याची फारशी वाच्यात होत नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये अवैध वाळू व्यवसायच्या कडक कारवाईचा इशारा दिला गेला. परंतु छातीठोक पणाने आम्ही कारवाई केली असे अधिकारी वर्ग सांगू शकतात का? असा प्रश्न पडला आहे.
वाळू व्यवसायसाठी अनेकांनी कर्ज घेतले हे वस्तुस्थिती आहे. तसेच या व्यवसायामुळे सुमारे पाच हजार कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. हे सुद्धा खरे आहे. पण ज्यांना वेतन भत्ते तसेच शासकीय लाभ मिळतो अशा लाभार्थ्यांसाठी वाळू लिलाव सुरू करणे कितपत योग्य आहे. असाही सवाल केला जात आहे.
दरम्यान, गाव कामगार तलाठी ते मान्यता देणार्या काही अधिकार्यांपर्यत याचे धागे दोरे आहेत. लिलाव प्रक्रिया झाली तर कोरोनाच्या संकटात आरोग्याची काळजी घेण्यासाठी काय उपाययोजना वाळू ठेकेदारांनी राबविल्या? याची ही माहिती उघड होणे गरजेचे आहे. असे बोलले जात आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |