अजित जगताप
सातारा: सध्या संगणक प्रणाली व वेबसाइटवर माहितीची देवाणघेवाण केली जाते पण, सातारा जिल्ह्यात तलाठी सरळसेवा भरती अंतिम निवड यादी वेबसाइटवर समाविष्ट करण्याऐवजी थेट निवड झालेल्या उमेदवारांना पोस्टाने कळविले जात असल्याने इतर उमेदवारांना आपण कशात कमी पडलो? कोणत्या निकषावर यादी तयार केली? असा प्रश्न पडला आहे, याबाबत न्यायालयात धाव घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सातारा जिल्ह्यातील महसुली गावात तलाठी संवर्ग पदे रिक्त होती. यासाठी २०१९ साली म्हणजे दोन वर्षांपूर्वी जिल्हा सरळसेवा भरती अंतर्गत ११४ तलाठी पदासाठी परीक्षा घेतली होती. त्यामध्ये गुणवत्ताधारक परीक्षार्थीं पास झाले होते. त्यांनी अनेकदा पाठपुरावा करून अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, कोरोना संकटात फक्त आरोग्य सेवा व वैधकीय क्षेत्रात भरती करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्यानंतर आता अंतिम निवड यादीतील उमेदवारांना पोस्टाने पत्र पाठवून दि २४एप्रिल रोजी सकाळी ११वाजता संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयात सर्व मूळ व साक्षांकित केलेल्या प्रमाणपत्रे घेऊन बोलविण्यात आले आहे. सदर अंतिम निवड यादी ही सातारा जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर समाविष्ट करणे सयुक्तिक ठरले असते. पण, असे घडले नाही. त्यामुळे गुणवत्ता असूनही आपला अंतिम यादीत नाव नाही. अशी भावना काहीची झाली आहे.
कोणत्या निकषामुळे यादीत नाव नाही. याचा खुलासा होणे गरजेचे आहे. अन्यथा न्यायालयात धाव घेतली जाईल असा इशारा पालकांनी व विविध संघटनांनी दिला आहे. सध्या कोरोना मुळे जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी तहसीलदार कार्यालयातून माहिती देण्यासाठी वेबसाइट, माहिती कार्यालयाचा वापर करून ही माहिती सार्वजनिक केली जात आहे. मग, तलाठी अंतिम निवड यादी वेबसाईटवर प्रसिद्ध का केली नाही? याचा खुलासा जिल्हा प्रशासनाने करावा, अन्यथा तीव्र आंदोलन सुरू करून नंतर न्यायालयात आव्हान दिले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.त्याची आता सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |