09:41pm | Aug 11, 2021 |
कराड : कराड नगरपालिकेच्या विशेष सभेत पालिकेतील पदाधिकारी व सदस्यांचे मानधन, भत्ते करोना उपाययोजनांसाठी पालिकेच्या फंडात वर्ग करण्याचा विषय मंजूर असताना नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी प्रोसिडींगमध्ये बदल करुन मानधन हा शब्द वगळला आणि स्वतःचा आर्थिक लाभ करुन भ्रष्टाचार केल्याचा आरोप लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी केला आहे.
भ्रष्टाचाराची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाषराव पाटील, नगरसेवक मोहसीन आंबेकरी, पल्लवी पवार व मान्यवर उपस्थित होते.
सौरभ पाटील म्हणाले, कराड नगरपालिकेची 15 मे 2020 रोजी विशेष सभा झाली होती. त्या सभेत शहरात वाढलेला कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी होणार्या खर्चामध्ये पालिकेच्या पदाधिकारी, सदस्यांनी खारीचा वाटा उचलावा, असे सर्वानुमते ठरवण्यात आले. त्यानुसार एप्रिल 2020 पासून हा पंचवार्षिक कालावधी संपेपर्यत पालिकेचे पदाधिकारी, सदस्य यांचे मानधन व भत्ते पालिकेच्या जनरल फंडात वर्ग करण्याचा विषय एकमताने मंजूर करण्यात आला होता. त्या मिनिट बुकमध्ये नगराध्यक्षा यांची सही आहे. असे असतानाही नगराध्यक्ष यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी उपसूचनेतील इतर सर्व मुद्दे ठरावात घेऊन मानधन हा शब्द हेतुपरस्पर वगळून ठराव तयार करण्यात आला.
तसेच त्याप्रमाणे आपल्या अधिकाराचा वापर करुन जवळपास सहा महिन्यांनी प्रोसिडींग बनवले. यातून नगराध्यक्षा यांनी सुमारे अडीच लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप गटनेते सौरभ पाटील यांनी केला आहे. असे कृत्य करुन नगराध्यक्ष रोहिणी शिंदे यांनी सभागृह व समस्त कराडकर नागरिकांचा विश्वासघात केला आहे. विश्वासाची परिस्थिती पालिकेत राहिली नाही. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. नगराध्यक्ष यांनी याबाबत सभागृह तसेच कराडकर नागरिकांची माफी मागावी, अशी मागणी सौरभ पाटील यांनी यावेळी केली.
दरम्यान, कराड शहर स्वच्छतेत जसे एक नंबर आहे, तसे ते भ्रष्टाचारातही एक नंबर असल्याचे हे उत्तम उदाहरण आहे. तर ठरावाची मूळ प्रत पालिका प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने सध्या पालिकेत विश्वासाची परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे अध्यक्षांनी सन्मानपूर्वक मानधनाचे पैसे पालिकेत जमा करावेत, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्याचे पाटील यांनी सांगितले.
प्रोसेडिंगमध्ये बदल करून स्वतःच्या स्वार्थासाठी भ्रष्टाचार केला असल्याचा आपला आरोप आहे. त्यास पालिका प्रशासन जबाबदार नाही का? या प्रश्नाला उत्तर देताताना सुभाषराव पाटील म्हणाले, भ्रष्टाचारास सर्वस्वी नगराध्यक्षा जबाबदार आहेत. ज्याची सही तोच जबाबदार असतो, असे पालिका प्रशासनाने प्रोसिडिंग लिहिताना काही बदल केले असतील तर नगराध्यक्षा यांनी मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करावी.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |