01:34pm | Jul 17, 2020 |
बुध: करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरीवर्ग अडचणीत आला असून साठवलेला कांदा सडू लागल्याने उकिरड्यावर कांदा फेकून द्यायची वेळ येथील शेतकर्यांवर आली आहे. यामुळे पुसेगाव परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र आहे.
खटाव तालुक्यातील उत्तर भागात रब्बी हंगामातील गारवा कांद्याची लागण मोठ्या प्रमाणात होत असते. हजारो एकर क्षेत्रावर गतवर्षी घेतलेला सुमारे पाचशे ट्रक कांदा केवळ दर व मागणी अभावी अद्यापही ऐरणीत पडून आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू होण्यापूर्वी काही दिवस कांद्याला विक्रमी बाजारभाव मिळत होता.
मात्र सद्यस्थितीत विक्रमी बाजारभाव मिळणार्या कांद्यानेच आता कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसह विविध कारणांमुळे कांद्याचे भाव चांगलेच कोसळले आहेत. यावर्षी उन्हाळी कांद्यांचे चांगले उत्पादन झाले. कांद्याचे बाजारभाव वाढतील या आशेने शेतकर्यांनी तीन-चार महिन्यांपासून ऐरणीत तसेच पुसेगाव येथील मार्केट कमिटीच्या गोडाऊन मध्ये कांदा साठवून ठेवला आहे. हा साठवलेला कांदा सडू लागल्याने मातीमोल भावात शेतकर्यांना कांद्याची विक्री करावी लागत आहे. त्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.
मागील वर्षी पाऊसकाळ चांगला झाल्याने येथील शेतकर्यांनी रब्बीच्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली होती. कांदा लागवड करणार्या शेतकर्यांचा कांद्याची रोपे तयार करण्यापासून ते लागवड करण्यावर खूप मोठा खर्च झालेला आहे. त्यातच कांद्याचे पीक काढण्यासाठी तयार झाले असतानाच करोनाचे संकट कोसळले. करोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून टाळेबंदी लागू करण्यात आली. यातून शेतीकामे वगळली असली तरी त्याचा विपरीत परिणाम झाला. कांदा काढण्यासाठी वेळेत मजूर मिळाले नाहीत. जे मजूर कामावर आले, त्यांनी दुप्पट मजुरी घेतली. शेतकर्यांनी अथक परिश्रमाने कांदा काढणी केली. मात्र त्यानंतर कांदा विक्रीला काढला असता व्यापारी खरेदी करण्यास फारसे उत्सुक नव्हते. काही व्यापार्यांकडून अत्यल्प भावात कांद्याची खरेदी करण्यात आली. यामुळे काही शेतकर्यांनी कांदा चाळीत साठवला, तर काहींना कांदा साठवण्यासाठी साधन नसल्याने बाजारात जो भाव मिळेल, त्या भावात कांदा विक्री केली. सध्या कांद्याला किलोमागे सहा ते सात रुपये बाजारभाव चालु आहे. कांद्याचा बाजारभावच वाढत नसल्याने साठवून ठेवलेला कांदा शेतकरी विक्रीसाठी काढत आहेत. परंतु शेतकर्यांनी साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणावर सडला असल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अत्यल्प भावामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांची कोंडी होताना दिसून येत आहे. टाळेबंदीमुळे कांद्याला मागणी नसल्याने शेतकर्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. शासनाने शेतकर्यांच्या या प्रश्नांकडे लक्ष देऊन याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.
पाणीपुरीच्या गाडीपासून ते पंचतारांकित हॉटेलपर्यंत सर्वच खाद्यपदार्थ व्यवसायाच्या ठिकाणी कांद्याचा उपयोग होतो. करोनामुळे गत तीन महिन्यांपासून टाळेबंदी लागू करण्यात आल्याने या काळात हॉटेलसह सर्व व्यवसाय, उद्योग ठप्प झाले आहेत. परिणामी, कांद्याची मागणी कमी आहे. उत्पादन जास्त व मागणी कमी असल्याने कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत. त्याचा मोठा फटका शेतकर्यांना सहन करावा लागत आहे.
कोरोनामुळे शेतमाल दरावर विपरीत परिणाम झाला आहे. पावसाळ्यानंतर च्या काळात नागरिकांना कांदा मिळावा तसेच त्यालाही दोन पैसे फायदा मिळावा म्हणून शेतकरी चार महिने कांद्याची साठवणूक करतो,मात्र सध्याच्या परिस्थितीत कांदा विक्रीतून उत्पादन खर्चदेखील फिटत नसल्याने शेतकर्यांच्या आर्थिक अडचणीत भर पडली आहे. कांदा दरवाढीची शक्यता नसल्याने शासनाने कांद्याला हमी भाव ठरवून देणे गरजेचे आहे.
- रामचंद्र घनवट नाना, कांदा उत्पादक शेतकरी, राजापूर
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |