सातारा : पश्चिम महाराष्ट्रात काही भागात वादळी वार्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने झालेली गारपीट शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करून गेली. हवामान खात्याने काही दिवसांपूर्वीच याबाबतची शक्यता वर्तवली होती. बुधवारी दुपारनंतर कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागात व माण खटावमधील मोळ व डिस्कळ परिसरात प्रचंड गारपीट झाल्यामुळे विविध पिकांचे लाखो नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. राज्यात लागलेला मिनी लॉकडाऊन, कोरोना आणि आता गारपीट झाल्याने शेतकरी पुरता कोलमडून गेला आहे.
कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रक, वाठार स्टेशन, अनपटवाडी, सोनके या गावांमध्ये पावसाच्या जोरदार सरी व गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे या भागात असणारे कांदा, ऊस आणि कलिंगड या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. उभ्या पिकात गारांचा खच पडल्याने पिके भिजून कुजण्याची दाट शक्यता आहे, तर उस कोलमडून पडला आहे. कांद्याच्या मुळांवर परिणाम झाल्याने कांद्याचेही मोठे नुकसान झाले आहे. या भागात सुमारे दोन तास गारपीट सुरू होती. घरांच्या छतावरच गारांचा खच साचल्याने अनेकांचे छप्पर गळत होते.
खटाव तालुक्याच्या उत्तर भागालाही गारपीटीने झोडपून काढले. तसेच वडूज कातरखटाव परिसरातही गारा पडल्या. येथे कांद्यासह फळबागांचे लाखोंचे नुकसान झाले. मोळ, डिस्कळ, मांजरवाडी, पसुचा मळा परिसरात गारांचा तुफान पाऊस पडला. यंदाच्या रब्बी हंगामातील या परिसरातील हा तिसरा गारांचा पाऊस आहे. गारपिटीने कांदा पिकाचे आणि ज्वारीच्या कडब्याचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा, चिक्कू, पपई आणि शेवग्याच्या बागांचेही आतोनात नुकसानझाले आहे. वडूजमध्येही गारांचा पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. कातरखटाव, येरळवाडी परिसरातही गारांच्या पावसाने शेतीचे नुकसान झाले. रस्त्यावर, शेतांमध्ये, घरांच्या अंगणात सर्वत्र गारांचा खच साचला होता.
यासह कोरेगावच्या अन्य भागात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. वाई तालुक्यातील बहुतांश परिसरात सरी कोसळल्या. रब्बी हंगाम ऐन काढणीत असताना आलेल्या या पावसामुळे शेतकर्यांची पिके पाण्यात गेली आहेत. यामुळे हातचे पिक वाया गेल्याने शेतकरी आर्थिक गर्तेत अडकला आहे. त्यामुळे या गारपीटीचा तत्काळ पंचनामा करून मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.
सध्या शेतात काढणीला आलेल्या पिकांची काढणी चालू होती. कांदा बियाणे खुडण्याची कामे सुरू होती. अनेक शेतकर्यांचे कलिंगड पिक ही अंतिम टप्प्यात आले आहे. त्याचे मोठे नुकसान झाले आहे. काढणी केलेले कांदा बियाणे झाकून ठेवताना शेतकर्यांची मोठी धांदल उडाली. तर शेतात उभी असलेली पिकं अक्षरशः गारा खाली झाकून गेली. शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
एका बाजूला कोरोना दुसर्या बाजूला निसर्ग अशी अवस्था शेतकर्यांची झाली आहे.कोरोनामुळे अर्थचक्राची गती मंदावली आहे. शेतमालाला दर मिळत नाहीत.त्यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकर्यांच्या नशिबी अवकाळी पाऊस आला आहे.त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे होत्याचे नव्हते झाले आहे. त्यामुळे या गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्वरीत मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |
मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |