02:40pm | Aug 01, 2020 |
सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या कारभाराबाबत टीकेची झोड उठत असताना आता जिल्हा परिषदेच्या ‘क’ व ‘ड’ वर्ग कर्मचारी, प्राथमिक शिक्षक अशा 1800 कर्मचार्यांच्या बदल्यांचा काळ उंबर्यापर्यंत पोहोचला आहे. या बदल्या पारदर्शक व्हाव्यात, तसेच वशिलेबाजीचे चक्रव्यूह भेदण्याची अपेक्षा शिक्षक कर्मचार्यांकडून व्यक्त होत आहे.
दरवर्षी शासकीय सेवेतील कर्मचार्यांच्या बदल्या या 31 मे पर्यंत शासन निर्णयानुसार करण्यात येतात. यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत. अशावेळीच कोरोना संकटाने प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा यांच्यावर मोठा ताण पडला आहे. अनेक कर्मचार्यांच्या राहत्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे अनेकांना प्रतिबंधित क्षेत्रामधून बाहेर पडता आले नाही. जिल्हा परिषदेचा विचार करता नवनिर्वाचित अध्यक्ष उदय कबुले यांनाच कोरोनाने गाठले. परंतू अध्यक्ष कबुले यांनी तातडीने कराड येथे जावून उपचार घेतल्याने ते निगेटिव्ह झाले आहेत. सध्या सातारा जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागात 598 कर्मचारी व 1200 शिक्षकांच्या बदल्यांसाठी ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात हालचाली सुरु झाल्या आहेत. जिल्हा परिषदेचे 68 सदस्य-सदस्या तसेच खासदार-आमदार आणि पक्षीय पदाधिकारी अशा सुमारे शंभर महत्त्वाच्या व्यक्ती, त्याचबरोबर नावलौकिक प्राप्त अधिकारी वर्ग यांच्या तोंडी शिफारशी जाणे क्रमप्राप्त आहेत. त्यामुळे या बदल्यांमध्ये नेमकी कोणाची मर्जी राखली जाईल, कोणावर अन्याय होईल, हे सांगणे कठीण आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या कारकीर्दीमध्ये राज्यपातळीवरील पुरस्कार मिळाला, याचे समाधान सर्वांनाच असले तरी शिक्षण विभागातील गहाळ झालेल्या फाईली, ग्रामसेवकांना पाठविण्यात आलेल्या नोटीसा, तसेच दोन दिवस जिल्हा परिषदेचे कामकाज बंद करावे लागले, या गोष्टीही प्रकर्षाने जाणवल्या आहेत. सध्या कृषी आणि अर्थ, बांधकाम, आरोग्य, सामान्य प्रशासन, पशूसंवर्धन व शिक्षण विभागातील बदल्या होत असताना अधिकारी-कर्मचार्यांव्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या बाहेरील काही व्यक्तींचा जिल्हा परिषदेतील वावर हा शंका उपस्थित करणारा वाटू लागला आहे. बदल्या आणि अर्थकारण याचे समीकरण अनेक वर्षे जिल्हा परिषदेत पहावयास मिळत असले तरी यंदाच्या बदल्यांमध्ये अनेकांना पारदर्शकतेबाबत आशा वाटू लागली आहे. त्यांनी अमिषाला बळी न पडता जिल्हा परिषद प्रशासनाने नेमूण दिलेल्या बदल्यांच्या ठिकाणी हजर होण्याची मानसिक तयारी केलेली आहे. जिल्हा परिषदेच्या आवारात बदली प्रक्रिया पार पडणार असून अधिकारीवर्गाने प्रामाणिकपणाने कर्तव्य बजावावे, अशी सक्त सूचना वरिष्ठ अधिकार्यांनी दिलेली असल्याची माहिती मिळत आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |