प्रकाश राजेघाटगे
बुध : दुष्काळी खटाव तालुक्यातील शेतकर्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असणार्या जिहे-कठापूर योजनेच्या पाण्याची चाचणी काल रात्री यशस्वीरित्या पार पडली. हे पाणी बोगद्याद्वारे नेर तलावातही पोहोचले. मात्र या योजनेच्या नामकरणावरुन सुरु झालेला वाद कधी मिटणार आणि या पाणी योजनेच्या उद्घाटनाचा मुहूर्त कधी निघणार, याकडे आता खटाव तालुक्यातील शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
1995 साली महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या युती शासनाने अनेक लोकोपयोगी योजना सुरू करून विकासाचा दर वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. कृष्णा नदीच्या पाणीवाटप करारानुसार महाराष्ट्र 2000 सालापर्यंत पाणी आडवू शकतो, हे सरकारच्या लक्षात येताच कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळाच्या माध्यमातून कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळवावे, असे धोरण ठरविण्यात आले आणि त्यातून जन्म झाला जिहे-कठापूर पाणी योजनेचा... कोरेगांव तालुक्यातील जिहे-कठापूर येथे पाणी अडवून तेथून ते पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे खटाव तालुक्यातील नेर तलावमध्ये सोडण्यात येणार, अशी ही योजना होती. कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून या योजनेला मान्यता देण्यात आली.
जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेला जरी मान्यता मिळाली तरी निधीच्या उपलब्धेबाबत शंका निर्माण होऊ लागली. यावर उपाय म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी बाजारात कर्जरोखे काढून पैसा उभा केला व मोठ्या थाटामाटात काम सुरू झाले. युती शासनाच्या काळात या योजनेचे 40-50 टक्के कामही पूर्ण झाले. आता ही योजना जर पूर्णत्वाकडे गेली तर काहींचे राजकारण गोत्यात येईल, ही भिती असल्यामुळे काही टगे-पुढारी जे पिढ्यानपिढ्या सत्तेच्या गुर्मीत जगले, ते अशा योजनांना खो घालण्यासाठी मैदानात उतरले. मग वेगवेगळी कारणे शोधून खटाव -माणला पाणी मिळू नये, म्हणून अडथळे आणू लागले. या योजना कशा चुकीच्या आहेत, खर्चिक आहेत याचे नसलेले ज्ञान पाजळू लागले. पण यांची चाल व डाव नवीन सत्ता मिळालेल्या मुख्यमंत्री मनोहर जोशी - गोपीनाथ मुंडे यांनी ओळखला होता. मग त्यांनी गांवगुड्डी राजकारण खेळायला सुरुवात केली आणि या योजनाची कामे धुमधडाक्यात चालू केली. यात मनोहर जोशी स्वतः आणि त्यांचे मामा सुधिरभाऊ जोशी, तर गोपीनाथ मुंडे, नितिन गडकरी या जोडगोळीनी महाराष्ट्रातील मोठमोठ्या प्रकल्पांना हात घालून ते प्रकल्प पुर्ण करुन सत्तेच्या माध्यामातून पुर्ण करण्याचा निर्णय घेतला. याची फलश्रृती म्हणजे सत्तेच्या 4-5 वर्षात उरमोडी धरण बांधून पुर्ण केले, जिहे-कठापुर योजनेचा वर्धनगड बोगदा, तर माण तालुक्यात जाणारा नेर धरण लगतचा बोगदा 60 ते %0 टक्के पुर्ण झाला. याचबरोबर पाईपलाईनचेही 30 ते 40 टक्के काम पुर्ण झाले. परंतु दुष्काळी जनतेच्या दुर्देवाने महाराष्ट्रातील सत्ता युतीकडून आघाडी सरकारकडे गेली आणि ज्यांनी या योजनांना विरोध केला, ते टगे-पुढारी सत्तेत आले. यानंतर या योजनांचे ग्रहच फिरले व एका क्रुर राजकारणाच्या चक्रव्यूहात या योजना अडकल्या. सत्तेत आलेल्या आघाडी सरकारने पैसे नाहीत, अशी खोटी कारणे सांगून या योजना बंद पाडल्या. या योजना पुन्हा चालू व्हाव्यात यासाठी तालुक्यातील जनतेने विशेषतः सातारा जिल्हा शिवसेनेने लहान-मोठी आंदोलने चालू केली. पण त्या संघर्षाला आघाडी सरकारने कधी किंमतच दिली नाही.
त्याही परिस्थितीत खटाव तालुक्यात कुसळात कमळ फुलवणारे, जनप्रश्नाचे ज्ञान असणारे दिलीपराव येळगावकर यांनी त्याच कुसळाचे भाले बनवुन या गेंड्याच्या कातडीच्या आघाडी सरकारच्या छातीवर मारले पण ते कुसळाचे भाले तत्कालीन आघाडी सरकारने पायदळी तुडवले. अशा दुष्टचक्रात अडकलेल्या या योजनांना निधी द्यायचा तर आघाडी सरकार मधील तत्कालीन मंत्री नकार देऊ लागले. आघाडी सरकारने या योजनेचा निधी जानाई-शिरसाई योजनेला वळवल्यामुळे सर्व आत्याधुनिक यंत्रसामुग्री जानाई-शिरसाई कडे हलवली. अशा रीतीने जिहे-कठापूर योजना बंद करण्याच्या दिशेने वाटचाल करू लागली.
ही योजना मरण अवस्थेत जात असताना पुन्हा देवेद्र फडणवीस सरकार (आघाडीची 15 वर्षे संपुर्ण) विराजमान झाले आणि या तालुक्यातील जनतेच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या. कारण भाजप-शिवसेनेचे सरकार या बंद असणारे योजनासाठी मदत करेल त्यासाठी हळूहळू प्रयत्न होवू लागले. याच दरम्यान अशा बंद पडलेल्या योजनांसाठी भारत सरकारची काही आर्थिक मदत होते आहे का? अशा चर्चा होवू लागल्या. महाराष्ट्रात आणि केंद्रात एकाच पक्षाचे सरकार असलेने तशी मदत होईल अशा आशा निर्माण झाली. परंतु केंद्रिय जल आयोगाची मान्यता असेल तरचं भारत सरकार काही निधी देवू शकते, अशी अट लक्षात येताच ती मान्यता मिळवण्यासाठी भाजप- शिवसेनेच्या सरकारने प्रयत्न चालू केले. सातारा जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आवश्यक कागदपत्रे घेऊन संर्व परिपूर्ण प्रस्ताव केद्रिय जल आयोगास दिला. केंद्रीय जल आयोगाने या प्रस्तावाला मान्यता देवून आवश्यक तो निधी केंद्रीय पाटबंधारे मंत्रालयाच्या वतीने दिला गेला.
दुष्काळी जनतेला वरदान ठरलेली ही योजना आता पूर्णत्वाकडे जात असून यामुळे खटाव-माण च्या जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना सुरू झालेली ही योजना शिवसेना मुख्यमंत्री असताना पूर्णत्वाकडे जात आहे, ही बाब विशेषपणे नमूद करणे गरजेचे आहे.
योजनेच्या नामकरणावरून वाद?
युतीच्या काळात सुरु झालेल्या या योजनेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नांव द्यावे अशी मागणी शिवसैनिका कडून करण्यात येत आहे. कारण शिवसेनेने या योजनेसाठी रस्तावर उतरून संघर्ष केला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षही शिवसेनाप्रमुखांच्या नावाविषयी आग्रही दिसत आहेत. शिवसेनेने विशेषतः मा.जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील व उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी या योजनेसाठी भरपूर आंदोलने केली आहेत. तर विद्यमान आमदार महेश शिंदे फडणवीस सरकारच्या काळात केंद्र सरकार कडून निधी उपलब्ध झाल्यामुळे या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू लक्ष्मणराव इनामदार यांचे नांव देण्यासाठी आग्रही आहेत. यामुळे येत्या काळात नामांकरणावरून वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण यावर शिवसेनेतील एकही जेष्ठ नेता बोलायला तयार नाही, हे विशेष म्हणावे लागेल.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |