12:31pm | Mar 27, 2024 |
तारळे : तारळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कळंबे, डफळवाडी, तोंडोशी या ठिकाणी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा अदानी ग्रुपचा हायड्रो पॉवर प्रोजेक्ट रद्द करावा, जनसुनावणी रद्द करावी. या प्रकल्पामुळे बाधित होणारे प्रकल्पग्रस्त व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी ता. ७ एप्रिल रोजी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा मेळावा घेणार असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी जाहीर केले.
येथील विकास सेवा सोसायटीच्या हॉलमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यास बाधित होणारी गावे आणि लाभक्षेत्रातील गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. पाटणकर म्हणाले, ‘‘हा पॉवर प्रोजेक्ट हा पूर्णपणे अव्यवहार्य असून, यामध्ये तेलंगणा राज्यातील एका प्रकल्पाचा अहवाल जोडून चुकीचा अहवाल तयार केला आहे. यामध्ये येथील जैवविविधता, निसर्ग साधन संपत्ती, वन्यजीव, भूकंपप्रवण क्षेत्र याचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख केलेला नाही.
तारळी धरणाच्या लाभक्षेत्रात असलेल्या गावातील सिंचनावर काय परिणाम होणार आहे, याचा उल्लेख केलेला नाही. काही लोक विकासाला विरोध करू नका म्हणून सांगतात; परंतु आधीच तालुक्यातील धरणांमध्ये ज्यांनी जमिनी दिल्या. त्यांचे काय हाल झाले व होत आहेत. याचा विचार केला आहे का?’’
डॉ. पाटणकर म्हणाले, ‘‘हा जिल्हा क्रांतिकारकांचा लढाऊ जिल्हा आहे. नाना पाटील, किसन वीर, दिनकरराव निकम या आणि अशा अनेक क्रांतिकारकांनी या जिल्ह्यात प्रतिसरकार स्थापन करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. हा इतिहास विसरता कामा नये. हे सह्याद्रीचे पठार आम्ही उद्ध्वस्त करू देणार नाही. हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा आहे. त्यामुळे राजकीय पक्ष बाजूला ठेऊन जनतेने एकत्र लढा देऊन जनसुनावणी रद्द करून घेऊया.’’
सदाभाऊ जाधव म्हणाले, ‘‘या प्रकल्पाला २०१४ रोजी मान्यता दिली आहे. दहा वर्षे लोक अंधारात आहेत. लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला गेला आहे. या ठिकाणी असलेल्या शाळा, मंदिरे याची नोंद घेतली नाही. शिवाय प्रदूषित पाणी नदीत सोडल्याने मासे, खेकडे किंवा पिण्याचे पाणी यावर होणारा परिणाम याचा विचार केलेला नाही.’’
या वेळी प्रशांत पवार, उत्तम मगर, राजाभाऊ जगधनी, प्रदीप निकम, भाऊसाहेब निकम, शंकर पन्हाळकर, जोतिराम जाधव, जोतिराम जाधव, खबाले बापू, अभिजित जाधव, सखाराम सपकाळ, ज्ञानदेव सपकाळ, भरत जाधव, आनंदा सपकाळ, जयसिंग पन्हाळकर, बाजीराव पन्हाळकर, शिवाजी जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. रमेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |