12:33pm | May 06, 2024 |
दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने करावल नगरमध्ये अशा दोन कारखान्यांचा पर्दाफाश केला आहे, जेथे सडलेला तांदूळ, लाकडाचा भुसा आणि केमिकलसह भेसळ केलेले मसाले तयार केले जात होते. हे दोन्ही कारखाने दिल्लीतील करावल नगर येथे आहेत. या घटनेत तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी करावल नगर येथून 15 टन भेसळयुक्त मसाले आणि कच्चा माल जप्त केला आहे. आरोपी संपूर्ण एनसीआर आणि इतर राज्यात भेसळयुक्त मसाल्यांचा पुरवठा करत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्न सुरक्षा विभागाने मसाल्यांचे नमुने घेतले आहेत. दिलीप सिंह उर्फ बंटी, सरफराज आणि खुर्शीद मलिक अशी आरोपींची नावं आहेत. ईशान्य दिल्लीतील अनेक उत्पादक आणि दुकानदार वेगवेगळ्या ब्रँड नावाने भेसळयुक्त मसाले तयार करून दिल्ली-एनसीआरमध्ये विकत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी गुन्हे शाखेच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले.
करावल नगरमध्ये भेसळयुक्त मसाल्यांचे उत्पादन करणाऱ्या दोन कारखान्यांवर छापा टाकण्यात आला. छाप्यादरम्यान एका कारखान्यातून दिलीप सिंह आणि खुर्शीद मलिक नावाचे दोन लोक सापडले. हे लोक भेसळयुक्त मसाले तयार करत होते. दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पथकाने त्यांना पकडले. पोलिसांनी कारखान्यातील मालाची तपासणी केली असता, सडलेला तांदूळ, बाजरी, खराब झालेला नारळ, लाकडाचा भुसा, केमकिल आणि अनेक झाडांच्या सालापासून मसाले तयार केले जात असल्याचे आढळून आले.
हे मसाले प्रत्येकी 50 किलोच्या मोठ्या पेटीत ठेवून बाजारात विकले जात होते. पथकाने अन्न व सुरक्षा विभागाला माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. भेसळयुक्त मसाले पश्चिम उत्तर प्रदेश आणि देशातील विविध राज्यांमध्ये पाठवले जात असल्याचं आरोपींनी सांगितलं. करावल नगर येथील या दोन कारखान्यांवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एकूण 15 टन भेसळयुक्त मसाले आणि कच्चा माल जप्त करण्यात आला आहे. हे प्रत्येकी 50 किलोच्या बॉक्समध्ये ठेवले जात होते. छाप्यादरम्यान खालील गोष्टी सापडल्या आहेत.
1) 1050 किलो सडलेला तांदूळ
2) 200 किलो सडलेली बाजर
3) 6 किलो खराब नारळ
4) 720 किलो खराब धणे
5) 550 किलो खराब हळद
6) 70 किलो निलगिरीची पाने
7) 24 किलो सायट्रिक एसिड
8) 400 किलो लाक़डाचा भूसा
9) 2150 किलो पशुखाद्य कोंडा
10) 440 किलो खराब लाल मिरची
11) 150 किलो मिरचीचे देठ
12) 5 किलो रासायनिक रंग
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर आणि दरडप्रवण क्षेत्रात खबरदारीच्या सर्व उपाययोजना तयार ठेवा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी |