सातारा : कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांचे गाव असलेल्या मर्ढे ता. सातारा येथील कृष्णानदीच्या पुलावर गेले आठ दिवसांपासून जलपर्णीचा विळखा पडला होता. याबाबत ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आठ दिवसांनी हा जलपर्णीचा विळखा काढण्याची मोहिम हाती घेतली आहे. त्यामुळे आता नागरीकांचा धोका टळला आहे. पण बा. सी. मर्ढेकर स्मारकाकडे जाणार्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या रस्त्याबरोबर मतदार संघातील वनगळ, बोरखळ आदी 18 गावांमधील रस्त्यांची रस्त्याच्या प्रश्न मार्गी लावला नाही तर आ. शशिकांत शिंदे यांना याची किमंत मोजावी लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी बोलताना दिला आहे.
गेली आठ दिवसांपासून सातार्यात मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडूंब वाहु लागले आहेत. चौहीकडे पाणीच पाणी झाले असून परीसर जलमय झाले आहेत. असे असताना मर्ढे येथील कृष्णा नदीच्या पुलावर जलपर्णीचे हिरवेगार मैदान निर्माण झाल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला होता. काल एका दुर्दैवी घटनेमुळे जिल्ह्यातून अनेक मान्यवर मंडळीनी मर्ढे गावाला भेट दिली. त्यावेळी त्याठिकाणी असलेल्या जलपर्णीच्या अस्तीत्वामुळे ही नदी आहे की, हिरवेगार मैदान असा भ्रम झाला होता. जलपर्णी मोर्यामध्ये अडकून पडल्या होत्या त्यामुळे पुलावरून पाणी वाहत होते. पुलांचे सुरक्षा कठडे कुठे आहेत हेच ये-जा करणार्या वाहन धारकांना आणि नागरीकांना समजून येत नव्हते. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती.
याबाबत सातारा पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र सावंत यांना ग्रामस्थांनी ही बाब सांगितली तसेच आंदोलनाचा इशारा दिला. त्याची तात्काळ दखल घेवून उपसभापती सावंत यांनी प्रशासनाला ही सर्व जलपर्णी हटविण्याच्या सुचना केल्या. त्यांनतर बुधवार दि. 18 रोजी सकाळपासून युध्द पातळीवर जेसीबीच्या सहाय्याने ही जलपर्णी हटविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाला धन्यवाद दिले. ही जलपर्णी काढण्यासाठी अजिंक्यतारा कारखाना संचालक नितीन भानुदास शिंगटे-पाटील, शेती उत्पन्न बाजार समिती संचालक अॅड. नितीन शिंगटे, अॅड. शिवणकर, शाम रोकडे यांच्यासह आदी ग्रामस्थांनी सहकार्य केले.
दरम्यान मर्ढे गावात कविवर्य मर्ढेकर यांचे स्मारकाला भेट देण्यासाठी अनेक साहित्यीक व विचारवंत मर्ढे गावाला भेटी देत असतात. पण येथील रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्त्याने वाहन चालविणे मुश्किल होवून बसले आहे. माजी पालकमंत्री व आ. शशिकांत शिंदे यांच्या मतदार संघातील शेवटच्या टोकाचे ‘सधन’ गाव आहे. या गावातील धार्मिक स्थळासाठी लाखो रूपये खर्च करण्यात आले. पण रस्त्याबाबत उदासिनता असल्यामुळे ग्रामस्थांना रस्त्याने चालणे अशक्य झाले आहे. जिल्हा परीषद व पंचायत समितीचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता नागरीक व्यक्त करीत आहेत. आता जलपर्णी काढली आहे. आता रस्त्यावरील खड्डे कधी मुजणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |