11:09pm | May 25, 2018 |
कुडाळ : प्रतापगड कारखाना हा जावळी व परिसरातील शेतकरी, सभासदांच्या मालकीचा आहे. सभासदांना कारखान्याच्या हितासंबंधी व भवित्यव्या विषयी आपले मत मांडण्याचा पुर्ण अधिकार आहे त्यांच्या अधिकारावर कोणीही गदा आणू शकत नाही. किसनवीर कारखान्याविषयी विश्वास होता म्हणूनच कारखाना चालवण्यास दिला होता मात्र किसनवीरच्या व्यवस्थापणाकडून गेल्या दोन वर्षांपासून सूरू असलेले एकाधिकारशाहीचे धोरण, तसेच आर्थिक बाजूने सूरू असेलेली ससेहोलपट आदी कारणांमूऴे सभासदांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्या नाराजीचा उद्रेक म्हणूनच शेतकरी सभासदांनी प्रतापगडवर मोर्चा काढून आपले निवेदन सादर केले होते. त्यामूळे किसनवीरच्या व्यवस्थापनानेही त्यांच्या निवेदनाचा विचार करून त्यांना योग्य न्याय देण्याच्या भावनेतून आपले म्हणणे सादर करणे अपेक्षित होते. मात्र कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी टोकाची भुमिका घेत सभासदांवर उपकार केल्याच्या भावनेतून व्यक्तव्य करून केलेली पत्रकबाजी ही निंदनीय असल्याचे मत प्रतापगडचे उपाध्यक्ष राजेंद्र फरांदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
किसनवीर व्यवस्थापनाने केलेल्या पत्रकबाजीला उत्तर देण्यासाठी प्रतापगड कारखाना कार्यस्थळवार संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते, पुढे ते म्हणाले, प्रतापगड लिलावापासून वाचवला त्यावेळेस कारखान्याचे ४७ कोटी कर्ज भरले आणि आज कारखान्यावर ७ वर्षांनी ५५ कोटी रूपयांचे कर्ज करुन ठेवलेत ही कारखाना वाचवण्याची अजबच व्याख्या किसनवीरची आहे. कर्ज कमी करण्यापेक्षा कर्जाच्या खाईत आणखी आोडून येथील सभासद, शेतकऱ्यांचे वाटोळे करून कारखाना वाचवल्याचा डांगोरा काय पिटता असा सवालही त्यांनी उपस्थित केला. किसनवीरच्या व्यवस्थापनाने जावळीच्या उसउत्पादक शेतकऱ्यांचा विस्वासघातच केला आहे, आमच्या भावनेचा सतत अपमान करून वास्तविक ७ वर्षात कोणत्या सभासदाचा ऊस किसनवीरने सभासद म्हणून गाळलाय का..? कोणते अधिकार जपलेत, कामगारांना चार महिन्यांपासून पगार नाही, ऊसाचे पेमेंट नाही, किसनवीर आणि प्रतापगड मध्ये झालेल्या कराराच्या अनेक अटी शर्थींचा भंग किसनवीर ने केलेला आहे त्यामुळे २०२९ इतके लांब काय तर २०१८ चा हंगाम सुद्धा तुम्ही घेऊ शकत नाही. जावळीकरांनी कष्टातून कारखाना निर्माण केला आहे.
इथं बलिदान दिले गेले आहे. अनेक वेळा प्रतापगड बंद ठेवण्याच्या धमक्या आम्हाला देऊन आमच्या भावनेशी खेळला, आम्ही मजबूर असल्याने जे आघात आमच्यावर होत होते ते निमूट पणे सहन केले, मात्र आता यापुढे ते कदापि सहन केले जाणार नाही वेळप्रसंगी शेतकरी, सभासद आणि कामगारांची ताकद काय आहे ती दाखवून दीली जाईल.. पुण्यातून खासदारकीत सरकून आपटलेल्यानी आम्हा जावलीकरांच्या मापं काढू नका आमच्या अस्मितेला हात लावण्याचा प्रयत्न केला तर जावळी चे पाणी दाखवू आरेरावी करण्याची परिस्थिती आपली राहीलेली आहे का ह्याचे भान ठेऊन बोला..आधी मागच्या गळीत हंगामाची ऊस पेमेंट द्या.. डिसेंबर पासून रखडलेलं पेमेंट चे शेतकर्यांना व्याज देणार का ? असा परखड सवालही त्यांनी उपस्थित केला आहे यावेळी संचालक जितेंद्र शिंदे, मालोजीराव शिंदे, अंकुशराव शिवणकर, बाळासाहेब निकम, विजय शेवते, प्रदिप तरडे, रघुनाथ तरडे यांच्यासह पदाधिकारी व सभासद, कार्यकर्ते उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |