05:35pm | Sep 20, 2018 |
सातारा : श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवृत्त कामगारांच्या ग्रॅच्युईटीची रक्कम सुमारे सहा वर्षापासून थकविलेली आहे. तीन महिन्यांपूर्वी आम्ही निकराचा लढा दिल्यानंतर दीडशे पैकी नव्वद कामगारांच्या ग्रॅच्युईटीची रक्कम कारखाना प्रशासनाला द्यावी लागली. परंतू अद्याप साठ कामगारांच्या ग्रॅच्युईटीची रक्कम कारखाना देणे बाकी आहे. त्यामुळे तुम्ही ‘फलटण शुगर’ प्रश्नी तोडगा काढण्यापेक्षा ‘श्रीराम’च्या साठ कामगारांच्या ग्रॅच्युईटीची रक्कम देण्याची अगोदर तरतूद करा. मगच फलटण शुगर प्रश्नी बोला. स्वत:चे ठेवायचे झाकुन आणि दुसर्याचे बघायचे वाकून’ ही पद्धत बंद करा, असा घणाघात फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ऍड. नरसिंग निकम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
फलटण तालुक्यातील शेतकर्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुमारे साठ वर्षापूर्वी फलटणमधील तत्कालीन राजेमंडळींच्या नेतृत्वाखाली श्रीराम सहकारी साखर कारखान्याची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी तालुक्यातील शेतकर्यांनी आपल्या स्थावर जंगम मालमत्तेवर कर्जे काढून प्रसंगी पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाण ठेवून श्रीराम कारखान्याचे शेअर्स घेतले होते. काही वर्षे हा कारखाना फलटण तालुक्यात सोन्याचा धूर सोडत होता. परंतू नरगिस बानोच्या नादाला लागून तत्कालीन अध्यक्षांनी कारखान्याला कर्जाच्या खाईत लोटले. दिवंगत हणमंतराव पवार यांनी श्रीराम कारखान्याची विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसविली. परंतू हणमंतराव पवार यांच्या अकाली निधनानंतर फलटणच्या राजेमंडळींनी हा कारखाना ताब्यात घेतला. परंतू कारखान्याला एवढे धुतले, की कारखाना अवसायनात निघाला. कारखान्यावर सध्या 80 कोटींचा बोजा आहे. असे असताना कारखान्यावरील कर्जे फेडण्यासाठी जनरल बॉडीच्या ठरावाने आणि साखर आयुक्तांच्या आदेशाने श्रीरामची असलेली जमीन व कामगारांच्या कॉलन्या तोडून फलटणच्या राजेमंडळींनी कारखान्याची जमीन सातार्यातील बिल्डरांच्या घशात कोंबली. दीड लाख रुपये गुंठ्याने ही जमीन विकण्यात आली. वास्तविक 2012 साली विक्री करण्यात आलेल्या जमिनीचा रेडी रेकनरसुद्धा विकण्यात आलेल्या जमिनीच्या कैक पटीने जास्त होता.
असे असताना कामगारांची राहती घरे तोडून, कारखान्याची जमीन विकूनही सुमारे 80 कोटींचा बोजा कारखान्यावर आहे. बिल्डरांना विकलेली जमीन 22 कोटी रुपये एकराने नगरपालिकेच्या टाळूवर मारण्याचा प्रयत्न फलटणमधील सत्ताधार्यांकडून सुरु आहे. 60 लाख रुपये एकराने कारखान्याने विकलेली जमीन तेच बिल्डर आज हीच जमीन नगरपालिकेला फक्त सहा वर्षात 22 कोटी रुपये एकर भावाने विकत आहेत. त्यामुळे फलटण तालुक्यातील आजवरचा सर्वात मोठा घोटाळा आहे. फलटणच्या राजेमंडळींनी कारखान्याच्या सभासदांसह तालुक्यातील शेतकर्यांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. 2012 साली श्रीराम मधून दीडशे कामगार निवृत्त झाले. त्यांची ग्रॅच्युईटीची रक्कम सुमारे 6 कोटी रुपये होती. कामगार निवृत्त झाल्यानंतर कोणाला ग्रॅच्युईटी फंडाच्या रकमेतून घर बांधायचे होते, कोणाला जागा खरेदी करावयाची होती, तर कोणाला मुला-बाळांची लग्ने लावायची होती. असे असताना फलटणच्या दाढीवाल्या बाबांनी निवृत्त कामगारांच्या 6 कोटींचा ग्रॅच्युईटी फंड आपल्या स्वत:च्या दूध डेअरीत मागच्या दाराने पळवला. त्यामुळे या दीडशे कामगारांचा तळतळाट यांना लागलेलाच आहे. नियती शेवटी सगळ्यांचा हिशोब करतेच. याची दखल संबंधितांनी घ्यायला हवी होती.
सहा महिन्यांपूर्वी निवृत्त कामगारांच्या ग्रॅच्युईटी फंडासाठी दीडशे कामगारांसहित मी उपोषणाला बसलो. त्यामुळे गेल्या महिन्यात जनाची नाहीतर मनाची लाज वाटल्याने यांनी नव्वद कामगारांची देणी दिली आहेत. साठ कामगारांच्या सुमारे दोन कोटी ग्रॅच्युईटीची रक्कम अजून श्रीराम कडे थकित आहे. यासाठी आम्ही आता उपोषणाला बसलो आहे. साठ कामगारांची दोन कोटींची रक्कम जोवर कारखाना प्रशासन चुकती करत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नसल्याचा इशारा ऍड. नरसिंग निकम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
डॉ. बी. के. यादव, डॉ. नंदकुमार तासगावकर या फलटण तालुक्यात आलेल्या उद्योजकांच्या भ्रृण हत्या कोणी केल्या, हे फलटणमधील शेंबडे पोरगेही सांगू शकेल. तालुक्यात सुमारे पंधरा वर्षापूर्वी बी. के. यादव यांनी आताच्या शरयू कारखान्याच्या ठिकाणी साखर कारखाना उभा करण्याचे ठरवले होते. तसेच डॉ. तासगांवकर यांनी बरडच्या माळावर साखर कारखाना उभा करण्याचे तयारी सुरु केली होती. परंतू क्रियानिष्ट असलेल्या फलटण नरेशांना हेसुद्धा पहावले नाही. स्वत:ची निष्क्रियता लपविण्यासाठी या दोन्ही उद्योजकांना अडचणीत आणण्याचे महापाप फलटण नरेशांनी केलेले आहे. त्यामुळेच तालुक्यातील शेतकर्यांना आपला ऊस परजिल्ह्यातील कारखान्यांना द्यावा लागला. त्यामुळे शेतकर्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. बापजाद्यांनी व फलटण तालुक्यातील शेतकर्यांनी उभा केलेला कारखानाही यांनी धुळीस मिळवला आहे. जव्हार व्यवस्थापन आहे म्हणून श्रीराम आहे. नाहीतर श्रीरामही भंगारात काढावा लागला असता. स्वत:ची अनैतिकता लपविण्यासाठी फलटण शुगरबाबत आपण नैतिकता दाखवित आहात, हे पुतणा मावशीचे प्रेम दाखविण्याचे बंद करा. मुख्यमंत्र्यांशी, अमक्याशी, तमक्याशी बोलू या थापा मारायच्या बंद करा. तुम्हाला श्रीराम नीट चालविता आला नाही, श्रीरामची जमीन विकली तरी 80 कोटींचा बोजा आहे. श्रीरामच्या निवृत्त साठ कामगारांची सुमारे दोन कोटींची ग्रॅच्युईटीची रक्कम देणे बाकी आहे. असे असताना फलटण शुगर प्रश्नी थापा मारायच्या बंद करा, असा सणसणीत घणाघात फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ऍड. नरसिंग निकम यांनी फलटण नरेश मि. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर केलेला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |