12:55am | Oct 01, 2018 |
कराड : लोकसभा व विधानसभा निवडणुकींचा आजच्या घडीला अंदाज बांधणे कठीण आहे. सध्याचे वातावरण भाजपाच्या विरोधात असलेतरी प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम यांनी वेगळी चूल उभी करणे म्हणजे भाजपाला पाठिंबा दिल्यासारखे आहे. त्यामुळे काँग्रेस कशी कमी करता येईल, असा बंदोबस्त भाजपवाले करणार यात कोणतीही शंका नाही. मात्र काँग्रेसकडे प्रचंड मुद्दे असूनही ते शांत का? असा सवाल प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा व आ. बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
कराड दौऱ्यावर असताना त्यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला, प्रहारचे जिल्हाध्यक्ष अजित बानुगडे-पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.
आ. बच्चू कडू म्हणाले, सध्या भाजपाकडे जेवढा पैसा आहे, तेवढा कदाचित अमेरिकेच्या अध्यक्षाकडेही नसेल. गेल्या पन्नास वर्षात जेवढे काँगे्रसला कमवता आले नाही, तेवढे भाजपने पाच वर्षातच कमवून घेतले आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष कसे मॅनेज करायचे हे त्यांना चांगले माहीत आहे. भाजप निवडणुकीचे राजकारण व्यवस्थित करेल यात शंका नाही. त्यामुळे त्यांना लढण्याची गरज पडणार नाही, असेच चित्र आहे. लोकांचा काँग्रेसकडे पाहण्याचा दृष्टीकोन अजूनही चांगला नाही. कारण गेल्या पन्नास वर्षात काँग्रेसने जे पाप या देशात केले, ते सर्व पाच वर्षात पाठीवर टाकून लोक समजून घेतील, असे अजिबात वाटत नाही.
ते म्हणाले, काँग्रेस अजूनही ठोस मुद्दे घेऊन समोर येताना दिसत नाही. त्यांच्याकडे प्रचंड मुद्दे आहेत, असे असतानाही ते शांत आहेत, हे कोडे न उलघडण्यासारखे आहे. काँग्रेसने शेतकऱ्यांविषयीचा एखादा ठोस मुद्दा घेऊन मोठ्या ताकदीने आंदोलन केले आहे, असे कुठे दिसत नाही. प्रकाश आंबेडकर व एमआयएम यांचा भाजपा एक नंबरचा शत्रू आहे. म्हणून त्यांचा भाजपला विरोध आणि भाजप नको म्हणून कांॅग्रेस असलेतरी चालेल, अशी त्यांची भुमिका आहे. परंतू वेगळ्या चुली मांडून या भुमिकेतून नेमके काय निष्पन्न होणार आहे? हे त्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना चांगले माहिती आहे. मात्र प्रहार संघटना व आम्ही जनतेसोबतच राहू, वेळप्रसंगी स्वतंत्र लढू, असेही आ. कडू यांनी सांगितले.
'आरएसएस'च्या कार्यकर्त्यासाठीच'...
भाजप सरकारकडून शासकीय व्यवस्था असतानाही नोकर भरती करण्याची प्रक्रिया खाजगी कंपनीला देण्यात आली आहे. ती कंपनी मध्यप्रदेशमधील एका घोटाळ्यात समाविष्ट आहे. पेपर काढण्यापासून ते सर्व काही कामे ही एक खाजगी कंपनी करत आहे. त्यामधून सरकारला भाजप व 'आरएसएस'चे कार्यकर्ते सरकारी नोकरीत आणायचे आहेत. त्यासाठीच हा खटाटोप सुरू असल्याचा आरोप एक प्रश्नाला उत्तर देताना आ. बच्चू कडू यांनी केला.
डिजीटल इंडिया आहे ना !
इव्हीएम मशीनमध्ये हस्तक्षेप करता येतो तर ऑनलाईन सरकारी यंत्रणेत करता येणार नाही का? असा सवाल करत बच्चू कडू म्हणाले, खाजगी कंपनीला सरकारी नोकर भरतीचा ठेका देण्याचे कारणच काय? पुण्याला जी परीक्षा झाली ती कॉफीच होती. ते म्हणाले, परीक्षा फक्त नावापुरती होते. पेपरचे लॉगींग बंद झाल्यानंतर ते पुन्हा ओपन करून पेपर लिहिले जात आहेत. याची माहिती संबंधीत आयुक्तांना विचारली तर ते सात दिवसात अहवाल आल्यावर पाहू म्हणाले. अहो, 'डिजीटल इंडिया आहे ना!' मग पाच मिनिटाच्या आत रिपोर्ट यायला पाहिजे, असा उपरोधिक टोला आ. कडू यांनी लगावला.
वेळप्रसंगी मारायला कमी करणार नाही
गरीबांची पोर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत, अभ्यास करतात. लाखो रूपये शिकवण्यावर खर्च करून सोळा सोळा तास डोळे फोडतात. मात्र सरकारी नोकरी गरीबांच्या पोराला न लागण्याची व्यवस्थाच भाजप सरकारने केली आहे. अधिकारी राजकीय पक्षांची दलाली करत आहेत, हे कोण सहन करणार? हे राज्य अधिकाऱ्यांच्या बापाचे आहे काय? त्यादिवशी चुकुन आम्ही संबंधित अधिकाऱ्याला मारले नाही. मात्र वेळप्रसंगी मारायलाही कमी करणार नाही. यावर कोणीही आमदार, खासदार बोलताना दिसत नाहीत.
लवकरच ऊस परिषद
ऊस दराचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या वर्षीची एफआरपीची रक्कम अद्याप कारखानदारांनी दिलेली नाही. उधारी किती दिवस असावी, याला मर्यादा आहेत. एखाद्या बँकेने दोन महिन्यासाठी जरी पैसे दिले तरी ते व्याज लावतात. मग ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही त्यांची उर्वरित रक्कम व्याजासह मिळाली पाहिजे. त्यादृष्टीने आम्ही सहकार आयुक्तांशी येत्या चार दिवसात मिटींग करणार आहे. तसेच एफआरपी, उपपदार्थांचे उत्पादन, ऊस उत्पादनासाठी येणार खर्च आदी विषयावर व्यापक चर्चा करून ऊस दराविषयीची भुमिका स्पष्ट करण्यासाठी लवकरच कराडमध्ये ऊस परिषदेचे आयोजन केले जाणार असल्याचेही आ. बच्चू कडू यांनी सांगितले.
मंत्रालयासमोर बावनकुळे यांचा उलटा पुतळा
सध्या शेतकऱ्यांना अडचणी आणून वीज बिल वसुली केली जात आहे. वीज बिलाबाबत चुकीचा काढलेला आदेश पंधरा दिवसात मागे घेतला नाहीतर मंत्रालयासमोर ऊर्जामंत्री बावनकुळे यांचा पाय बांधलेला उलटा पुतळा टांगून आंदोलन करणार आहे. तसेच भुगर्भातील पाणी उपसा केले म्हणून फक्त शेतकऱ्यांवर पाणीकर लावून शेतकऱ्यांच्या विरोधात हा कायदा केला जात आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या कायद्याला येत्या अधिवेशनात आम्ही विरोध करणार असल्याचे आ. कडू यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |