02:31am | Oct 11, 2019 |
सातारा : सातारा जिल्ह्याने संपूर्ण देशाला दिशा दिली हा इतिहास आहे. म्हणूनच भाजपाच्या माध्यमातून विकासाचे नवे पर्व सुरू करण्यासाठी निवडून आल्यावर अवघ्या तीन महिन्यात खासदारकीचा राजीनामा दिला. असे धाडस दाखवण्याचे केवळ राज्यातीलच नव्हे, तर देशातील हे एकमेव आणि पहिले उदाहरण आहे. फक्त आणि फक्त सातार्याचा विकास हेच ध्येय समोर ठेवून आपण हा निर्णय घेतला. नव्याने जनतेचा कौल घेतानाही लोकशाहीतील राजे आमची प्रचंड मताधिक्क्याने पाठराखण करतील, अशी खात्री वाटते, असा दृढविश्वास श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक आणि सातारा - जावली विधानसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूकीतील भाजप- शिवसेना- रिपाई व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार अनुक्रमे श्री. छ. उदयनराजे भोसले आणि श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवडणूक प्रचारार्थ येथील कल्याण रिसॉर्ट सभागृहात आयोजित सातारा व जावली तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या जाहीर मेळाव्यात ते मतदारांशी संवाद साधत होते.
या वेळी श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, जि. प.चे माजी अर्थ सभापती सुनील काटकर, राजू भोसले, बाळासाहेब गोसावी, संदीपभाउ शिंदे, सर्जेराव सावंत, भिकूभाउ भोसले, शिवसेनेचे निमिश शहा, चंद्रकांत जाधव, धर्मराज घोपडे, बबनराव देवरे, जि. प. सदस्या सौ. अनिताताई चोरगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नदी जोड प्रकल्प किंवा ग्रामिण आणि शहरी भागाच्या औद्योगिकरणाचे स्वप्न केवळ भारतीय जनता पक्षाच्या दुरदृष्टीमुळेच साकार होवू शकते असे सांगुन श्रीमंत छत्रपती उदयनराजे पुढे म्हणाले की, सन 1996 मध्ये स्व.अटलबिहारी वाजपेयींचे सरकार देश चालवित होते. तेव्हा आणि सध्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणारे महायुतीचे सरकार असो, या मंडळींना देशातील गोरगरिबांची दुखेः दूर करण्याची तळमळ आहे. त्यामुळेच मुख्य प्रवाहात सामिल होत साता-याचे नंदनवन व्हावे म्हणूनच आम्ही भाजपामध्ये गेलो आहोत.रखडलेले व रखडवलेले अनेक प्रकल्प भाजपाने मार्गी लावले आहेत. आमच्या विरोधात निवडणुक लढवणारे आणि आम्हावर टिका करणारे जेष्ठ आणि श्रेष्ठ मंडळींनी अनेक महत्वाची पदे भुषविली आहेत.ते त्या पदांवर असताना,आपल्या भागाचा का विकास करु शकले नाहीत, केवळ आपल्या बगलबच्यांना सांभाळण्याचाच उद्योग त्यांनी केला.उच्यस्तरीय पदे भुषविल्यावर आमदार व खासदार होण्यात त्यांना या वयात का रस निर्माण झाला याचा जनतेने विचार करावा आणि मतपेटीव्दारे त्यांना धडा शिकवावा असे आवाहन केले.
श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, आपल्या मतदार संघाचा विकास साधावयाचा असेल तर सत्तेच्या विरोधात राहुन चालत नाही. सध्या राज्यासह संपूर्ण देशात भाजपाचा वारु वेगाने दौडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखे सक्षम आणि कणखर नेतृत्व देशाला प्रगतीपथावर नेत आहे.अश्या परिस्थितीत विकासाच्या बाजुने आपण आणि जनतेला नेण्यासाठीच आम्ही महायुतीच्या माध्यमातुन निवडणुकीला सामोरे जात आहोत. प्रत्येक कार्यकर्त्याने आपण स्वतः उमेदवार आहेत असे समजुन, ग्रामपंचायत निवडणुकीत केली जाणार धावपळ यावेळीही करावी, जेणेकरुन मतदानाची टक्केवारी वाढेल. कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी यांनी मतदार यादीचा अभ्यास करावा. गाफिल न राहता, निवडणुकीसाठी यंत्रणा राबवावी. यश आपलेच आहे मात्र प्रचंड मताधिक्य मिळवून लोकसभा आणि विधानसभेला आम्हास निवडुन द्यावे.
यावेळी विविध पदाधिकारी यांची उत्स्फुर्तपणे भाषणे झाली. त्यामध्ये दोन्ही महाराजांना आपापल्या गावातुन आणि गटातुन विक्रमी मते देण्याचा निर्धार विविध वक्त्यांनी व्यक्त केला.
या मेळाव्यास अण्णाबापू सावंत, अनंता वाघमारे, अड. जाधव, माजी उपसभापती संजय पाटील, प्रवीण धस्के, सयाजी पाटील कोर्टीकर, दिलीप निंबाळकर, उद्योजक अरूण कापसे, नामदेवराव सावंत आदींसह सातारा- जावली तालुक्यातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायट्यांचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |