07:08pm | Apr 07, 2020 |
सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांवर संगम माहुली, ता. सातारा येथील कैलास स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करू नये, अशी मागणी जोर धरू लागल्यामुळे भविष्यातील धोका ओळखून जिल्हा प्रशासनाने सातारा शहरानजीक निर्जनस्थळी विद्युत दाहिनी उभारावी अशी मागणी साताऱ्यातील विविध संस्था व संघटनांकडून जोर धरू लागली आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास आणि संसर्ग कमी होण्यास मदत होणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
अजित पवार साताऱ्याचे पालकमंत्री असताना बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांच्या पुढाकाराने संगम माहुली येथे कैलास स्मशानभूमी उभारण्यात आली. अजित पवार यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या निधीमध्ये लोकांनीही मोठ्या प्रमाणावर आपला सहभाग नोंदवला. एकाच वेळी सहा ते आठ मृत झालेल्या माणसांवर अंत्यसंस्कार करण्याची अत्याधुनिक सुविधा या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली. सातारा शहरासह उपनगरातील मृत झालेल्या नागरिकांवर याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येतात. पारंपरिक पद्धतीने मृतदेह दहन करण्यात मोठा धोका आहे. कितीही काळजी घेतली तरी एखादी चूक फार मोठी महागात पडू शकते. या धर्तीवर पुणे-मुंबई, नाशिक, नागपूर या मोठ्या शहरांमध्ये जागेची कमतरता आणि इंधनाची बचत लक्षात घेऊन महानगरपालिका, नगरपालिका यांनी अंत्यसंस्कारासाठी विद्युत दाहिन्या उभारल्या आहेत. मोठ्या शहरात रोज शेकडो लोक विविध कारणांनी मृत्युमुखी पडतात. त्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर इंधनाची गरज निर्माण होते. त्यामुळे गेल्या तीन दशकांपासून मोठ्या शहरात विद्युतदाहिनी उभ्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास वाचण्याबरोबर इंधनाची बचत मोठ्या प्रमाणावर होत आहे.
सध्या देशावर कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. आतापर्यंत देशात मृतांची संख्या १३६ तर महाराष्ट्रात ५२ आणि सातारा जिल्ह्यात १ वर पोचली आहे. संगम माहुली, ता. सातारा येथे कोरोना संशयित रुग्णावर अंत्यसंस्कार करताना जिल्हा प्रशासनाची मोठी फरफट झाली. संगम माहुली येथे संबंधितावर अंत्यसंस्कार करण्यास तेथील स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला. दरम्यान सातारा तहसीलदार आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. सर्व प्रकारची खबरदारी घेऊन त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण अंत्यसंस्कार स्थळाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. तरीही घटनास्थळी पडलेल्या हातमोजे मुळे वाद निर्माण झाल्याने त्यावर जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले.
एकूणच भविष्यामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण दगावू नये, अशीच आरोग्य विभागाची धारणा आहे. मात्र भविष्यात खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने सातारा शहरालगत निर्जनस्थळी ज्या ठिकाणी लोकांचा वावर नाही, अशा ठिकाणी विद्युत दाहिनी उभारावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. विद्युत दाहिनी मुळे मृतदेह जळून खाक होतो त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका खूप कमी असतो. उलट पारंपारिक पद्धतीने मृतदेह पूर्ण जळण्यासाठी काही तासांचा अवधी लागतो, त्यामुळे संसर्ग वाढण्याचा खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सातारकरांच्या या मागणीचा विचार करून त्यावर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |