08:32pm | Oct 21, 2018 |
महाबळेश्वर : धनिकांच्या विनापरवाना बांधकामांना अभय आणि स्थानिक नागरीकांच्या घरावर बुलडोजर अशी पक्षपाती भुमिका पालिकेने घेवु नये, अन्यथा पालिकेच्या विरोधात शिवसेना तीव्र आंदालन छेडेल असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे व माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
महाबळेश्वर हे चारही बाजुंनी जंगलांनी वेढलेले आहे. त्यामुळे या शहराचा गावठाण विस्तार झाला नाही. असे असताना लोकसंख्या मात्र वाढत चालली आहे. त्यामुळे येथील नागरीक घराजवळ असलेल्या मोकळया जागी अथवा टेरेसवर बांधकाम करून आपल्या निवासाची सोय करीत आहेत. अशा काही स्थानिक लोकांविरोधात काही बंगले धारकांनी उच्चस्तरिय सनियंत्रण समिती व हेरीटेज समितीकडे तक्रारी केल्या होत्या. या धनिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेवुन या दोन्ही समित्यांनी स्थानिक नागरीकांच्या काही बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. धनिकांचे बांधकाम पाडण्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेने स्थानिकांच्या विरोधातील कारवाईच्या आदेश गांभिर्याने घेतले व मोजकी तीन ते चार बांधकांमावर कारवाई करण्याची तयारी सुरू केली, कारवाईचा दिवस निश्चित करून पोलिस संरक्षण मागविण्यात आले. पालिकेने धनिकांच्या बांधकामांना अभय देवुन स्थानिकांच्या बांधकामावर हातोडा मारण्याची तयारी सुरू केल्याने शहरात तीव्र नाराजी पसरली, ज्यांच्या बांधकामावर कारवाई होणार होती, त्यांनी जिल्हयाचे पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांचेकडे धाव घेतली, व त्यांनी यामध्ये लक्ष घालुन स्थानिकांना न्याय देण्याची भुमिका घेतली. पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने पालिकेने कारवाई स्थगित केली. त्यामुळे स्थानिकांना दिलासा मिळाला पालिकेने कारवाई थांबविली असली तरी या सर्वच बेकायदा बांधकामांवर कारवाईची टांगती तलवार मात्र कायम राहणार आहे.
या संदर्भात भुमिका मांडण्यासाठी आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे व माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी संयुक्त पत्रकार परीषद घेतली व त्यांनी पालिकेच्या धोरणामुळेच शहर व परीसरात मोठया प्रमाणावर बेकायदेशीर बांधकामे वाढली आहेत. तसेच पालिका विनापरवाना बांधकामांना अभय देते विनापरवाना बांधकामांचा जो राक्षस शहरात उभा ठाकला आहे. त्याला केवळ पालिकाच जबाबदार आहे. असा घणाघाती आरोप कुंभारदरे व बावळेकर यांनी केला. आजही शहरात मोठया प्रमाणावर विनापरवाना बांधकामे सुरू आहेत. तर काही बांधकामे तयार झाली आहेत. तयार झालेल्या काही बांधकामांना पालिकेने नोटीसा बजावल्या आहेत. तर काही बांधकामांना नोटीसा न बजावता त्यांना अभय दिले जात आहे. या पुर्वीही न्यायालयाने काही धनिकांच्या विनापरवाना बांधकामांविरोधात निर्णय दिला असतानाही, पालिकेने त्यांचेवर कारवाई केली नाही. तक्रारी करूनही धनिकांच्या बांधकामावर कारवाई केली जात नाही, ही बांधकामे कोणाची आहेत आणि त्यांना का वाचविले जात आहे. पालिकेच्या मुख्याधिकारी कायम पक्षपाती भुमिका घेत आल्या आहेत. याची जिल्हाधिकारी यांनी चौकशी करावी पुरावे आम्ही देवु या पैकी सि.स नं. 63 'क' या मिळकतीचे उदाहरण कुंभारदरे व बावळेकर यांनी दिले. ते म्हणाले की साडे पाच एकर असलेली ही मिळकत पुर्ण जंगलांनी व्यापली आहे. तेथे पाय ठेवायलाही जागा नाही. या मिळकतीमध्ये पालिकेने 1998 साली बांधकाम परवानगी दिली होती. परंतु वृक्षांमुळे बांधकाम करता येत नाही. म्हणुन धनिकांनी येथे विनापरवाना मोठया प्रमाणावर वृक्षांची कत्तल केली. या संदर्भात पालिकेने मिळकत धारकावर कारवाई केली, ही मिळकत ना विकास क्षेत्र म्हणुन जाहीर केले. ठराविक मुदतीत बांधकाम न केल्याने पुर्वी दिलेली बांधकाम परवाणगी रद्द् झाली होती.
या बांधकामाचे नुतनीकरणाचे या धनिकांनी अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु बांधकाम नियम डावलुन कोणत्याही या मिळकत धारकाची बांधकाम परवाणगीचे नुतनीकरण केले नाही. मात्र चालु वर्षी नियम डावलुन पालिकेने या बांधकामाचे नुतनीकरण केले. या प्रकरणाची सखोल चैकशीची मागणी कुंभारदरे व बावळेकर यांनी केली 63 क प्रमाणे अनेक मिळकतींना बांधकाम नियम डावलुन परवाणगी देण्यात आली आहे. याबाबत आम्ही सर्व पुरावे गोळा केले असुन, या सर्व प्रकरणाच्या चौकशीची मागणी करणार आहोत. जर या प्रकरणाच्या चौकशीत वरीष्ठ अधिकारी यांनी दुर्लक्ष केले तर वेळ प्रसंगी या प्रकरणाच्या चौकशीसाठी आम्ही न्यायालयात जायला मागे पुढे पाहणार नाही असल्याचेही त्यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |